२२ हजार २९२ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:28+5:302021-01-21T04:26:28+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २२ हजार ८९२ वर पोहोचली आहे. सध्या १२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ...

22 thousand 292 people defeated Corona | २२ हजार २९२ जणांची कोरोनावर मात

२२ हजार २९२ जणांची कोरोनावर मात

Next

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २२ हजार ८९२ वर पोहोचली आहे. सध्या १२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एक लाख ९० हजार ६३९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ६६ हजार ७३ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३८३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३४७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ एक, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या २१ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, चिमूर एक, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना आजार गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावेत व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 22 thousand 292 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.