शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २,०९५ महिलांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST

चंद्रपूर : महिलांना राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद झाली. या तरतुदीमुळे ग्रामपंचायतमधील राजकारणाचे पारंपरिक चित्र बदलले. ...

चंद्रपूर : महिलांना राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद झाली. या तरतुदीमुळे ग्रामपंचायतमधील राजकारणाचे पारंपरिक चित्र बदलले. जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २,०९५ महिला विजयी झाल्या. यातील बहुतांश महिला सदस्यांनाच पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

महिलांमध्येही सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होऊन नेतृत्व करण्याची क्षमता असते. कुटुंब व्यवस्थेतील अर्थकारण व सामाजिकीकरणाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या महिलांचे ज्ञान, अनुभव गावाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतु, संधी मिळत नसल्याने त्यांचा नाईलाज असतो. हाच उद्देश समोर ठेवून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले. २४ एप्रिल १९९३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लागू झाला. जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींमधील ४,१९१ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये ५० टक्के आरक्षण तरतुदीनुसार २,०९५ महिला विजयी झाल्या आहेत.

कुटुंबाचे पाठबळ असेल तर शक्य

महिलांनी थेट राजकारणात सहभाग घेतल्यास ग्रामीण भागातील पारंपरिक राजकीय नेत्यांकडून आडकाठी आणल्या जाते. नामांकन अर्ज दाखल करण्यापासूनच असे प्रकार घडतात. चिमूर, गोंडपिपरी, मूल, भद्रावती व राजुरा तालुक्यात अशा घटना घडल्या. मात्र, राजकारणात प्रथमच पाऊल टाकणाऱ्या महिलांना कुटुंबाकडून भक्कम पाठबळ मिळाले. त्यामुळे त्या निवडून येऊ शकल्या.