शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल, याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी हा सराव केला जाणार आहे.

ठळक मुद्देआठ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : पुढचे काही दिवस संयम पाळा, जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हावासीयांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या गावांमधील नागरिकांनी स्वत:च्या गावाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. गावात येणाºया प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनीदेखील आजूबाजूच्या आजारी व संशयित रुग्णांबाबत जागरूकता बाळगावी. वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी. सध्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आठ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पुढील काही दिवस घराबाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल, याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी हा सराव केला जाणार आहे.नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने गरजेसाठी आठवडयातून एकदाच बाहेर पडण्याची सवय लावावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.आरोग्य विभागाचे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन २३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १५ नमुने निगेटिव आहेत. आठ नमुन्यांचा अहवाल अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.महानगरपालिकेकडून दररोज निराधार, गरीब कुटुंबांना अन्न पुरविले जात आहे.जिल्ह्यात ४१ निवाराकक्षजिल्हा प्रशासनाला एकीकडे आरोग्य यंत्रणा बळकट करताना दुसºया बाजूने लाकडाऊनमुळे अडकून पडलेल्या दुसºया राज्यातील व जिल्ह्यातील शेकडो लोकांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करावी लागत आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांसह प्रमुख शहरांमध्ये ४१ निवारा कक्ष उघडण्यात आले आहे. यामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या राहण्याची अंथरूण-पांघरूणाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच जे बेघर आहेत. विमनस्क, एकटे व ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याची यंत्रणाच नाही, अशा नागरिकांसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्या मदतीने महानगरपालिकेच्या नियोजनात कम्युनिटी किचन अविरत सुरू आहे.जिल्ह्यात १०३ जण नव्याने क्वारंटाईनजिल्ह्यातील १०३ जणांना गुरुवारी नव्याने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात चंद्रपूर-६, वरोरा-१५, पोंभूर्णा-४, जिवती-२०, बल्लारपूर-२८, गोंडपिपरी-६ व ब्रह्मपुरीतील २४ जणांचा समावेश आहे.१९,९९० जणांचे होम क्वारंटाईन पूर्णजिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बाहेर देशातून व अन्य राज्यातून, अन्य जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची संख्या २६ हजार ५३६ आहे. सध्या निगराणीमध्ये असणाºया प्रवाशांची संख्या ६५४६ आहे. १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या १९ हजार ९९० आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची संख्या २० आहे. आरोग्य विभागांचा जिल्ह्यामध्ये कसून सर्वे सुरू असल्याचेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.३५ लोकांना अटकसंपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत ३५ लोकांना अटक करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या ९६ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २१५ वाहने ताब्यात घेण्यात आले असून चार लाख ४२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या