शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

तुमच्या उत्पन्नातील २० टक्के वाटा भविष्यात करील जादुई करामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 2:55 PM

सुखी भविष्य आणि आनंदी वर्तमानासाठी करुन पाहाच..

ठळक मुद्देज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा कमाईला सुरुवात कराल, त्या दिवसापासून आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढा.त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.आज वाचवलेले वीस टक्के तुम्हाला सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.

- मयूर पठाडेआपल्याला जगण्यासाठी किती पैसे लागतात? खरंतर याचं उत्तर जितकं सोपं आहे तितकंच अवघडही आहे. कारण नुसतं जगण्यासाठी फारसा पैसा लागत नाहीच, पण आपल्या वेगवेगळ्या अपेक्षा, गरजा आणि अडचणीच्या प्रसंगात किती पैसा आपल्याला लागेल याची मात्र काहीच शाश्वती नसते. त्यासाठी आपल्या हाती काही पुंजी असणं आवश्यक असतं. काही गरजा तर निव्वळ आर्थिक असतात.तुम्ही जर काही लोन घेतलेलं असेल, तर त्याचे हप्ते भरायचे असतात. हे हप्ते जर वेळेवर भरले गेले नाहीत, तर त्यावर मोठा दंड बसू शकतो. भवितव्यासाठी काही गुंतवणूक करावी लागते. काही पैसा बाजूल काढून ठेवावा लागतो. रिटायरमेंटसाठी काही प्लॅनिंग करुन ठेवावं लागतं.या साºया गोष्टींसाठी वेळीच आपल्याला सारी तयारी करुन ठेवावी लागते. ती जर केली नाही, तर ऐनवेळी फारच तारांबळ होते आणि त्याचं टेन्शन खूप मोठं असतं.त्यासाठीचा एक सर्वात सोपा उपाय आहे. तुम्ही अगदी विद्यार्थी दशेपासूनच स्वत:ला बचतीची आणि काही पैसे बाजूला काढून ठेवण्याची सवय लावली पाहिजे. अगदी आपल्याला जो पॉकेटमनी मिळत असेल तर त्यातूनही काही पैसा बाजूला काढला पाहिजे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा जेव्हा कुठल्याही माध्यमातून तुम्ही कमाईला सुरुवात कराल, अगदी त्या दिवसापासून तुम्ही आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढली पाहिजे. त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. अनेक जणांना काही अघटित घडल्यावर किंवा उतारवयात जाग येते, आपण काहीच प्लॅनिंग केलं नाही याचं. तसं करणं धोक्याचं आहे. आज आपल्या कमाईतले वाचवलेले वीस टक्के तुम्हाला नुसतं योग्य आणि शाश्वत, सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.त्यासाठी कराल एवढं? काढाल आजपासूनच आपल्या कमाईतील वीस टक्के वाटा बाजूला?..