शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

चिमुकल्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:08 AM

धाड: जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड  येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री १0.३0 ला उघडकीस  आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. 

ठळक मुद्देपांगरखेड येथील घटनागावासह परिसरात पसरली शोककळा 

लोकमत न्यूज नेटवर्कधाड: जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड  येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री १0.३0 ला उघडकीस  आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथील नंदकिशोर जाधव  यांना दोन मुले नामे अभय (वय ११) व गौरव (वय ७) हे  गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. अभय हा  चौथ्या  वर्गात तर गौरव दुसर्‍या वर्गात शिकत होता. दिवाळीच्या सुट्या  असल्याने दोन्ही मुले गावाजवळीलच आपल्या गट नं. ६४  मधील शेतात खेळण्यासाठी जात होती. दरम्यान, २८ ऑक्टोबर  रोजीसुद्धा दोन्ही मुले शेतात गेली; परंतु रात्री उशिरापर्यंत परत न  आल्याने घरच्यांनी दोन्ही मुलांची शोधाशोध सुरू केली.  दरम्यान, रात्री १0 च्या सुमारास नंदकिशोर जाधव यांच्या गट नं.  ६४ मधील शेतातील विहिरीत मोठा मुलगा अभयचा मृतदेह  तरंगताना नागरिकांना आढळला. तर गौरवचा पत्ता लागत  नसल्याचे पाहून तब्बल चार विद्युत पंपांनी विहिरीतील पाणी उ पसा करण्यात आल्यावर गाळात गौरवचा मृतदेह आढळला. या  घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी धाड  पोलिसांनी र्मग दाखल केला असून, उत्तरीय तपासणी बुलडाणा  जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्यानंतर शव ना तेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे. पुढील तपास धाड  पोलीस करीत आहे. २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर पांगरखेड  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सैलानी ढासाळवाडी तलावात भाविक बुडालापिंपळगाव सैलानी: बुलडाणा तालुक्यातील सैलानी ढासाळवाडी  तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी भाविक बुडाला असून, त्याचा  पोलीस यंत्रणा व महसूल विभाग शोध घेत आहेत.जालना जिल्ह्यातील कृष्णा काशिनाथ गिरनारे (वय ३0 वर्ष)  हा भाविक सैलानी दग्र्यावर दर्शनासाठी आला होता. तो पत्न ीसोबत सैलानी ढासाळवाडी तलावात पोहण्यासाठी गेला असता  त्याने तलावात उडी मारल्यावर तो वर आलाच नाही, त्यामुळे या  घटनेची माहिती रायपूर पोलीस स्टेशनला दिली. यावरून त्याचा  शोध घेण्यासाठी बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे यांच्या  मार्गदर्शनाखाली बोटीसह शोधपथक नेमण्यात आले. यामध्ये  बुलडाणा नायब तहसीलदार गणेश माळी, जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, मंडळ अधिकारी विजय  मोरे, तलाठी गणेश वानखेडे, किशोर पाटील, कैलास राऊत,  प्रकाश उबरहंडे, अतुल झगरे, किशोर राऊत, हळदे यांचा  समावेश आहे. या तलावात एका वर्षामध्ये जवळपास १0 ते १२  भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रायपूर  पोलीस स्टेशनने वारंवार घाटनांद्रा ग्रामपंचायतला या तलावावर  येणार्‍या भाविकांकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्याचे  सांगितले; परंतु अद्यापही संबंधितांनी याबाबत नियोजन करून  उपाययोजना केलेल्या नाहीत.

टॅग्स :Crimeगुन्हा