शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकासासाठी नियोजन नाही

By admin | Updated: September 2, 2015 02:26 IST

पर्यटन विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नियोजन समितीने पुढाकार घेण्याची मागणी.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : जिल्ह्याला निसर्गरम्य वारसासह ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या मोठी परंपरा आहे; मात्र पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक स्थळे दुर्लक्षित आहेत. पर्यटनाच्या नकाशावर शेगाव, लोणार व सिंदखेडराजा या तीन प्रमुख शहरांच्या विकासासाठी घोषित आराखडे वादातच अडकले आहेत. या स्थळांव्यतिरिक्तही इतर पर्यटनस्थळे दुर्लक्षित असून, पर्यटन नियोजन आराखडा होणे गरजेचे आहे.बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तरेला गाविलगडचा डोंगर असून, तो सातपुडा पर्वताचा भाग आहे. दक्षिण भागात अजिंठा डोंगर आहे. निसर्गाने बुलडाणा जिल्ह्यात आपले सौंदर्य मुक्तहस्ते उधळले असले तरी या सौंदर्याचे सोने करण्याची क्षमता असलेले धोरण कागदावरच आहे.शेगावमध्ये संत गजानन महाराज यांचे भव्य असे मंदिर आहे. येथील आनंद सागर या प्रकल्पामुळे तर या शहराची ओळख देशविदेशात पोहोचली आहे. याठिकाणी दर्शनाच्याच एकमेव हेतूने नव्हे, तर पर्यटक म्हणून येणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने शेगाव शहर विकास आराखडा मंजूर केला होता; मात्र सहा वर्षे उलटले तरी कामे पूर्णत्वास गेलेली नाही. जगप्रसिद्ध लोणार ठिकाण देशी-विदेशी अभ्यासकांसह पर्यटकांचे नेहमी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. याठिकाणी असलेल्या विविध मंदिरांमुळे येथे पर्यटकांबरोबरच भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या सरोवराचे संवर्धन व संरक्षणासाठी विकास आराखडा दहा वर्षांपूर्वी २२५ कोटींचा मंजूर करण्यात आला होता; मात्र केवळ १0 कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला. त्यापैकी केवळ साडेपाच कोटीच खर्च झाले असून, झालेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. १४00 प्रस्तावित पहिल्या टप्प्यातील घरकुलांपैकी फक्त ३५0 घरकुले पूर्ण झाली असून, पाण्याची वितरण व्यवस्था अपूर्ण आहे.मेहकरचा बालाजी तसेच तालुक्यातील साखरखेर्डा हे गावही महत्त्वाचे आहेत. मढ गावाच्या पुढे गेल्यास बुधनेश्‍वराचे पीठ मानल्या गेलेल्या या ठिकाणापासून पैनगंगेचा उगम झाला. या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर जाळीचा देव हे महानुभाव पंथीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थळ आहे. येथे चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. बुलडाणा शहरापासून काही अंतरावर स्वयंप्रकाश महाराज यांचे गिरडा पर्यटन केंद्र आहे; तसेच मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटाच्या माथ्यावर प्रती तिरूपतीचे व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे, असा अनेक संपन्न वारसा लाभलेला असतानाही पर्यटन विकासाला केंद्र मानून विकासाचे नियोजन झालेले नाही. त्यामुळे पर्यटनासह रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्याचा विकास खोळंबला आहे.