शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दहा टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:41 IST

आतापर्यंत अवघ्या १० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जमीनतील ओलावा कमी झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी खोळंबली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या १० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.अतिवृष्टीने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरून न निघणारे आहे. अति पावसाने जमीनीत ऐवढे पाणी साचले होते, की काही शेतकऱ्यांनी मोटारपंप लाऊन आपल्या शेतातील पाणी बाहेर काढले. सध्या शेतात पाणी साचलेले दिसत नसले तरी, जमीनीत अती ओलावा असल्याने मशागतीची कामे करणे अवघड आहे. या अतिपावसाचा परिणामा सध्या रब्बी हंगामावर होत आहे. रब्बी पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर टाकल्यानंतर या पेरणीयंत्राला चिखलाचे गोळे लागातात. त्यामुळे शेतकरी पेरणी करू शकत नाहीत. बुलडाणा तालुक्यासह मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, चिखली या भागामध्ये सध्या ही समस्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या उरकत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे नियोजित क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यामध्ये गहू, हरभरा पिकाचा पेरा सर्वाधिक असतो. परंतू सध्या कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात अवघ्या १०.८० टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. १७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडे आहे. यामध्ये जमीनीत असलेला अति ओलावा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नदीपात्राच्या परिसरातील शेती निकामी!अतिवृष्टीमुळे नदीपात्राच्या परिसरातील शेती निकामी झाल्याचे दिसून येते. अनेक शेतामधील मातीच खरडून गेली आहे. जिल्ह्यातून पैनगंगासह इतर अनेक नदीपात्र वाहतात. त्या नदीपात्राच्या काठावरील शेतात खरीपाचे नुकसान झालेच; शिवाय रब्बी हंगामाची पेरणी करणेही अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचे क्षेत्र झपाट्याने वाढत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तालुका निहाय पेरणीजिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात १ हजार १, संग्रामपूर तालुक्यात ३५२ हेक्टर, चिखली तालुक्यात १ हजार ३६० हेक्टर, देऊळगाव राजा तालुक्यात ४ हजार ७९६ हेक्टर, सिंदखेड राजा तालुक्यात ९ हजार ९६ हेक्टर, मोताळा तालुक्यात ४३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी