शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 4:50 PM

हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : चातुर्मासानिमित्त राज्यातील ५२९ गावांमध्ये श्वासानंद नामजप अभियान राविण्यात आले. ‘ॐ ब्रह्मी श्वासानंदाय नम:’ असा हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये जन्मलेले एकोणिसाव्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांना इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या गुरुगादीवरील चौथे उत्तराधिकारी अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या आदेशाने त्यांच्या भक्तांतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ५२९ लहानमोठ्या गावांमध्ये ‘श्वासानंद नामजप अभियान’ राबविण्यात आले. एकाचवेळी एवढ्या गावांमध्ये सारख्याच पद्धतीने शिस्तबद्धरित्या राबविल्या गेलेल्या या उपक्रमाची आध्यात्मिक प्रांतात विशेष दखल घेतल्या जात आहे.संत बाळाभाऊ महाराज यांचा भक्तवर्ग राज्यात आणि देशातच नव्हे तर विदेशातही विखुरलेला आहे. गुरुभक्तांच्या या विशाल संप्रदायाचे संवाहक विद्यमान पीठाधीश अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांनी महाराजांच्या महामंत्राचा सामुहिक नामजप करण्याची प्रेरणा दिली. आणि राज्यस्तरीय नामजप अभियान समिती गठित होऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चातुर्मासातील चार महिन्यांचा पवित्र कालावधी या अभियानासाठी निवडण्यात आला. या उपक्रमाच्या विशेष नोंदपुस्तिका तयार करण्यात येऊन त्या राज्यस्तरीय समितीचे संयोजक सुरेश बोचरे (औरंगाबाद), सहसंयोजक श्रीरंग सावजी (मेहकर), श्वासानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष उमाळकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने महाराष्ट्रात सर्वत्र पोचविल्या. या उपक्रमाला गुरुभक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. अभियानाची सांगता चातुर्मास समाप्तीनंतर मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये गायत्री परिवाराच्या पौरोहित्याखाली विधिवत होम-हवन करून या अभियानाची सांगता करण्यात आली. कार्तीक पोर्णिमेला या अभियानाची सांगता झाली. मुंबईपासुन ते चंद्रपूरपर्यंत एकूण ५२९ गावांमध्ये ठरविलेल्या पद्धतीनुसार शिस्तबद्धरीतीने हे अभियान राबविण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक