शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा; सुबोध सावजी यांची मागणी

By ब्रह्मानंद जाधव | Updated: November 2, 2023 16:56 IST

राज्यात १०० टक्के जनजीवन विस्कळीत होऊन न भूतो न भविष्यती संपत्तीची हानी होत असल्याचे सावजी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 

डोणगाव : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्रातील सर्व जातिधर्माच्या वतीने विनंती केल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रातील शासनाचे अपयश, निष्क्रियता, बेजबाबदारपणा याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील शांतता, सुव्यवस्था ढासळत जात आहे व ढासळलेली आहे. मराठा समाजाच्या जातप्रमाणपत्राकरिता राज्यात आत्महत्येचे फार मोठे सत्र सुरू झाले आहे. तसेच राज्यात १०० टक्के जनजीवन विस्कळीत होऊन न भूतो न भविष्यती संपत्तीची हानी होत असल्याचे सावजी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 

आपला या मागणीकरिता सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय राज्यकर्ते सर्व जातिधर्माचे महिला-पुरुष, तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पाहिली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा समाजाच्या जातप्रमाणपत्राचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSubodh Savjiसुबोध सावजी