शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा संघर्ष कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 2:24 PM

अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.

- ब्रम्हानंद जाधव   लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात अति पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. शेत आणि शेतरस्ते जलमय झालेले आहेत. पावसाच्या ताडाख्यातून उरला-सुरला शेतमाल घरी आणणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.जिल्ह्यात पावसाने ९० टक्क्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतकºयांच्या डोळ्यासमोरून शेतातून वाहून गेल्या. जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसानझाले आहे़ मका, कापूस, ज्वारी आणि सोयाबीनचे हाताशी आलेले उत्पादन शेतकºयांना गमवावे लागले आहे़ सध्या पावसाने उघडीप दिली आहे. मात्र शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांना पाय ठेवायला जागा सुद्धा राहिली नाही. शेतातील दलदल पाहून शेतात पावसापासून वाचलेला काही माल घरी आणणे अवघड होऊन बसले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतातच उभ्या आहेत. सोयाबीनच्या सुड्या काढण्यासाठी एकही मळणीयंत्र शेतात पोहचू शकत नाही. काही सोयाबीनच्या सुड्या तर जाग्यावरच काळवंडल्या आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनच्या सुड्या काढाव्या की, नाही हाच मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

शेतमाल घरापर्यंत पोहोचणार का?अनेकांच्या शेतात आजही सोयाबीनच्या सुड्या लागलेल्या आहेत. तो शेतमाल घरापर्यंत पोहचेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. शेत आणि शेतरस्ते जलमय झाल्याने शेतात ट्रॅक्टर किंवा मळणीयंत्रण जाऊ शकत नाही. गेल्यास ते ट्रॅक्टर फसण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.एकाच ठिकाणी बसून तलाठी जुळवताहेत शेतकºयांच्या याद्यापावसाने झालेल्या नुकसानानंतर शेतकºयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून मोठी तत्परता दाखवण्यात आली. त्यासाठी सर्वेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. परंतू अनेक तलाठी एकाच ठिकाणी बसून शेतकरी आणि त्यांचा पेरा याची यादी तयार करताना आढळून आले. मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठ्यांनी शेतात न जाताच गावात बसूनच याद्यांची जुळवाजुळव केल्याचे दिसून आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती