शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

सामाजिक ऐक्य परिषदांचे सकारात्मक परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 1:45 PM

संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: समाजात एकोपा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या सामाजिक ऐक्य परिषदांचे बुलडाणा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम येत असल्याचे चित्र  आहे. विविध धार्मिक सण, उत्सव आणि इतर सामाजिक सणांच्यावेळी आयोजित सामाजिक ऐक्य परिषदांमुळे समाजातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मदत होत असल्याचे दिसून येते. संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. पोलिस प्रशासनाकडून समाजात वेळप्रसंगी कायद्याचा बडगा उगारल्या जातो.  समाजातील अपप्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक असतो. मात्र, काहीप्रसंगी पोलिसांमधील मानविय दृष्टीकोन काम करून जातो.  प्रेम आणि आत्मिय भावनेमुळे अट्टल गुन्हेगार सुधारल्याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. व्यक्ती सोबतच समाजाच्या बाबतीतही हीच बाबू लागू पडते. त्यामुळे गत काही दिवसांमध्ये बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बुलडाणा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘सामाजिक ऐक्य परिषद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धार्मिक सण, उत्सव आणि महत्वाच्या प्रसंगी सामाजिक ऐक्य परिषद आणि शांतता समिती सभांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक सौहार्द राखण्यासाठी मदत मिळाली.

 येथे झाली ‘सामाजिक ऐक्य परिषद’!

बुलडाणा जिल्ह्यात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव, विविध धार्मिक सुणासुदीच्या काळात तसेच महत्वाच्याप्रसंगी सामजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यात येतात. सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचे एकाचवेळी प्रबोधन ठेवण्यात येते. मानवतेचा दृष्टीकोन हे धर्मगुरू समाजासमोर मांडतात. सामाजिक एकतेचे महत्व पटविणाºया सामाजिक ऐक्य परिषदा घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, वडनेर भोलजी, जळगाव जामोद, जामोद, पिंपळगाव राजा, मलकापूर, माटरगाव तर घाटावरील बुलडाणा, चिखली, मेहकर, साखरखेर्डा, देऊळगाव राजा, दुसरबीड, बोराखेडी, धाड, मेहकर येथे घेण्यात आल्या.

 शांतता समिती सभांनाही सकारात्मक यश!‘सामाजिक ऐक्य परिषद’ या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसोबतच बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखाली आणि घाटावरील विविध विभागात शांतता समितीच्या बैठका सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येतात. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात १८ शांतता समितीच्या सभा आयोजित करण्यात आल्या. या बैठकांना विविध ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 

 बुलडाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गोष्ट कायद्याने सुधारू शकत नाही. अनेक ठिकाणी मानवीय दृष्टीकोन कामी येतो. समाजात सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत.- डॉ. दिलीप पाटील भुजबळजिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिकkhamgaonखामगाव