शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीने राकाँ चिंतीत

By admin | Updated: June 15, 2014 00:46 IST

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने शिवसेना कंबर कसून कामाला लागली आहे.

सिंदखेडराजा: सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत राकॉंची शिवसेनेशी सरळ लढत होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने शिवसेना कंबर कसून कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे राकॉंत थोडेसे चिंतेचे वातावरण असले तरी, या बालेकिल्ल्यावर आपला झेंडा फडकवत ठेवण्यासाठी तो पक्ष जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र दिसत आहे.

सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी याच मतदारसंघात असल्याने, त्यांच्या कार्याचे पोवाडे आजही प्रत्येक गावात गुंजतात. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्ह्णून रिंगणात उडी घेऊन, विजय मिळविला आणि शिंगणे घराण्याचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला. पुढे डॉ. शिंगणे यांनी शिवसेनेचे सहयोगी सभासदत्व मिळविले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजतागायत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात काँग्रेस नेहमीच आक्रमक भूमिका घेत असते. ती भूमिका निवडणूक जाहीर होईपर्यंत कायम राहते. निवडणूक आखाड्यात डॉ. शिंगणे यांच्यासोबत जाण्याचे आदेश येवून धडकताच, पेल्यातील वादळ पेल्यातच शमते. आजवरच्या निवडणुकांमध्ये असाच अनुभव आला आहे.

मतदारसंघाची अदलाबदल व्हावी आणि यावेळी काँग्रेसला हा मतदारसंघ सुटावा यासाठी देवानंद कायंदे, अभय चव्हाण ही काँग्रेसची मंडळी देव पाण्यात ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या मुद्यावर ठाम असून, उमेदवारी पुन्हा डॉ.राजेंद्र शिंगणे यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी नकार दिला तरच तोताराम कायंदे किंवा रेखाताई खेडेकर यांचा विचार केला जाऊ शकतो; मात्र सध्या तरी डॉ.शिंगणे हेच उमेदवार राहतील, अशी चिन्हं दिसत आहेत. अभय चव्हाण यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेवटी काँग्रेस असा वतरुळाकृती प्रवास झाला आहे. त्यांनी एकदा विधानसभा निवडणूक लढविली होती. आता पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी ते इच्छुक आहेत. जागा काँग्रेसला सुटल्यास सौ. नंदाताई कायंदे यासुद्धा रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात पक्षाने सपाटून मार खाल्ला. तब्बल ३0 हजाराचे मताधिक्य सेनेला मिळाल्याने, प्रत्येकाच्या मनात धडकी भरली आहे; मात्र आजवर प्रत्येक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अनुकूल राहिलेला हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत मात्र प्रतिकूल झाल्याचा इतिहास आहे. वसंतराव मगर, विठ्ठलराव मोरे, छगनराव मेहेत्रे, डॉ.शशिकांत खेडेकर यांनी शिवसेनेतर्फे टक्कर दिली; पण विजयश्रीने प्रत्येक वेळी हुलकावणीच दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीतील विजय पाहून, विधानसभा निवडणुकीतही जोर लावण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. शशिकांत खेडेकर हे तिसर्‍यांदा शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. छगनराव मेहेत्रे, रविंद्र पाटील, दिलीप वाघ, दादाराव खर्डे हेदेखील इच्छूक आहेत; परंतु उमेदवारीबाबत शिवसेनेचे पत्ते सध्या तरी गुलदस्त्यातच आहेत. महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचे विनोद वाघ लोकसभा निवडणुकीनंतर ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णचा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. मनसेचे रेल्वे इंजिन किती डब्बे जोडण्यात यशस्वी होते, यावरच त्यांचे गणित अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघावरही जातीय समिकरणांचाच प्रभाव असल्यामुळे, कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणत्या समाजाच्या उमेदवाराला मिळते, यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे.