शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:15 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.

ठळक मुद्देतीन लाखांचे कर्ज : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील घटना

चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.
अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया चिचाळ येथील भारत तलमले या शेतकऱ्याकडे चिचाळ व पाथरी शेतशिवारात असे एकूण तीन एकर शेती आहे. दरवर्षी निसर्गाची अवकृपा परिणामी उत्पादन कमी आले. लागवडीचा खर्च व मिळणारे उत्पादन यात प्रचंड तफावत असल्याने कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा, कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तलमले राहायचे.
त्यांच्यावर बँक आॅफ इंडिया कोंढा विविध कार्यकारी सोसायटी, पवनी तालुका सहकारी पत संस्था, गावातील महिला बचत गटाचे कर्ज यासह गावातील अन्य लोकांचे हात उसणवारीचे असे जवळपास तीन लक्ष रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सततच्या नापिकीमुळे ते नेहमी विवंचनेत असायचे. यामुळेच त्यांनी मृत्युला कवटाळले असावे, अशी माहिती मृतक भारत तलमले यांच्या पत्नीने लोकमतशी बोलताना दिली.
भारतने जनावरांच्या गोठ्यात ठेवलेले किटकनाशक प्राशन केले. त्यांना प्रथम अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील पडोळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तलमले यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडिल असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
घराचा कर्ता पुरूष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मृतकाची पत्नी मनिषा तलमले यांच्या खांद्यावर आली आहे. शासनाने तलमले यांचे कर्ज माफ करून सदर कुटुंबाला दोन लक्ष रूपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही चिचाळ ग्रामवासियांनी केली आहे.