शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:27 IST

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर,जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा,

बुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या आठ टक्के पाऊस पडला असला तरी अद्याप पाणीटंचाई निकाली निघण्याच्या दृष्टीने दमदार असा पाऊस झाला नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. परिणामी जून अखेरही जिल्ह्यात तबब्ल ३०७ टँकरद्वारे २८४ गावांना पाणीपुरवठा होत असून ६७६ गावांमधील ९४३ विहीरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत करण्यात आलेल्या आहे.खरीप हंगामाला यंदा सुरूवात झाल्यानंतरही अपेक्षीत पाऊस जिल्ह्यात पडलेला नाही. जून महिन्याचीच पावसाची तुट ही ६३ टक्क्यांच्या जवळ आहे. त्यामुळे जोपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा दमदार असा पाऊस पडत नाही तोवर पाणीटंचाईचा ससेमिरा काही सुटणार नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका वगळता अन्य सर्व १२ तालुक्यात अद्यापही टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठाही तीन टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे मधल्या काळात पडलेल्या सरासरी ५२ मिमी पावसामुळेही प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षीत वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस न पडल्यास जुलै महिन्यातील स्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. जून महिन्यात अपेक्षीत असणारा सरासरी १४१.६ मिमी पाऊसही जिल्ह्यात पडलेला नाही. वर्तमान स्थितीत केवळ ५२.७ सरासरी पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी ही ३७.१९ टक्के आहे. अर्थात जून महिन्यात ६३ टक्के पावसाची तूट जिल्ह्यात आहे. त्यामुळे येत्या काळात जर दमदार पाऊस जिल्ह्यात पडला नाही तर टँकरग्रस्त गावांसोबतच ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांनाही पाण्याच्या उपलब्धतेची समस्या भेडसाऊ शकते. त्यामुळे जून महिन्यात पावसाने एक प्रकारे जिल्ह्याला चकवल्या सारखेच आहे.जिल्ह्यात एक हजार १९५ पाणी पुरवठा योजना आहे. जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा सारख्या काही योजना वगळता अन्यत्र दमदार पाऊस न पडल्यास पाणीटंचाईची समस्या अधिक गडद बनू शकते असा कयास आहे. दरम्यान, २३ आणि २४ जून रोजी पडलेल्या पावसामुळे टँकरच्या स्थितीत काही बदल झाला काय? याची माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली.तालुका निहाय टँकरची संख्याबुलडाणा ४६, चिखली २७, देऊळगाव राजा २९, मेहकर ३०, लोणार १३, सिंदखेड राजा ३०, खामगाव ४३, शेगाव २७, संग्रामपूर १, मलकापूर ८, मोताळा २५, नांदुरा २१ या प्रमाणे तालुकानिहाय टँकरची संख्या आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात टँकरने त्रिशतक पार केले आहे. २८४ गावांना सध्या ३०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.९४३ विहिरी अधिग्रहीतटंचाईची दाहकता अद्यापही ग्रामीण भागात असून ६७६ गावांतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी ९४३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. दरम्यान, अधिग्रहीत करण्यात आलेल्या काही विहीरींना पाणीच उपलब्ध नसल्याने काही पर्यायी विहीरी प्रशासनास अधिग्रहीत कराव्या लागल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे.
टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई