शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:27 IST

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर,जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा,

बुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या आठ टक्के पाऊस पडला असला तरी अद्याप पाणीटंचाई निकाली निघण्याच्या दृष्टीने दमदार असा पाऊस झाला नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. परिणामी जून अखेरही जिल्ह्यात तबब्ल ३०७ टँकरद्वारे २८४ गावांना पाणीपुरवठा होत असून ६७६ गावांमधील ९४३ विहीरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत करण्यात आलेल्या आहे.खरीप हंगामाला यंदा सुरूवात झाल्यानंतरही अपेक्षीत पाऊस जिल्ह्यात पडलेला नाही. जून महिन्याचीच पावसाची तुट ही ६३ टक्क्यांच्या जवळ आहे. त्यामुळे जोपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा दमदार असा पाऊस पडत नाही तोवर पाणीटंचाईचा ससेमिरा काही सुटणार नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका वगळता अन्य सर्व १२ तालुक्यात अद्यापही टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठाही तीन टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे मधल्या काळात पडलेल्या सरासरी ५२ मिमी पावसामुळेही प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षीत वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस न पडल्यास जुलै महिन्यातील स्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. जून महिन्यात अपेक्षीत असणारा सरासरी १४१.६ मिमी पाऊसही जिल्ह्यात पडलेला नाही. वर्तमान स्थितीत केवळ ५२.७ सरासरी पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी ही ३७.१९ टक्के आहे. अर्थात जून महिन्यात ६३ टक्के पावसाची तूट जिल्ह्यात आहे. त्यामुळे येत्या काळात जर दमदार पाऊस जिल्ह्यात पडला नाही तर टँकरग्रस्त गावांसोबतच ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांनाही पाण्याच्या उपलब्धतेची समस्या भेडसाऊ शकते. त्यामुळे जून महिन्यात पावसाने एक प्रकारे जिल्ह्याला चकवल्या सारखेच आहे.जिल्ह्यात एक हजार १९५ पाणी पुरवठा योजना आहे. जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा सारख्या काही योजना वगळता अन्यत्र दमदार पाऊस न पडल्यास पाणीटंचाईची समस्या अधिक गडद बनू शकते असा कयास आहे. दरम्यान, २३ आणि २४ जून रोजी पडलेल्या पावसामुळे टँकरच्या स्थितीत काही बदल झाला काय? याची माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली.तालुका निहाय टँकरची संख्याबुलडाणा ४६, चिखली २७, देऊळगाव राजा २९, मेहकर ३०, लोणार १३, सिंदखेड राजा ३०, खामगाव ४३, शेगाव २७, संग्रामपूर १, मलकापूर ८, मोताळा २५, नांदुरा २१ या प्रमाणे तालुकानिहाय टँकरची संख्या आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात टँकरने त्रिशतक पार केले आहे. २८४ गावांना सध्या ३०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.९४३ विहिरी अधिग्रहीतटंचाईची दाहकता अद्यापही ग्रामीण भागात असून ६७६ गावांतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी ९४३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. दरम्यान, अधिग्रहीत करण्यात आलेल्या काही विहीरींना पाणीच उपलब्ध नसल्याने काही पर्यायी विहीरी प्रशासनास अधिग्रहीत कराव्या लागल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे.
टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई