शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:27 IST

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर,जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा,

बुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या आठ टक्के पाऊस पडला असला तरी अद्याप पाणीटंचाई निकाली निघण्याच्या दृष्टीने दमदार असा पाऊस झाला नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. परिणामी जून अखेरही जिल्ह्यात तबब्ल ३०७ टँकरद्वारे २८४ गावांना पाणीपुरवठा होत असून ६७६ गावांमधील ९४३ विहीरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत करण्यात आलेल्या आहे.खरीप हंगामाला यंदा सुरूवात झाल्यानंतरही अपेक्षीत पाऊस जिल्ह्यात पडलेला नाही. जून महिन्याचीच पावसाची तुट ही ६३ टक्क्यांच्या जवळ आहे. त्यामुळे जोपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा दमदार असा पाऊस पडत नाही तोवर पाणीटंचाईचा ससेमिरा काही सुटणार नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका वगळता अन्य सर्व १२ तालुक्यात अद्यापही टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठाही तीन टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे मधल्या काळात पडलेल्या सरासरी ५२ मिमी पावसामुळेही प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षीत वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस न पडल्यास जुलै महिन्यातील स्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. जून महिन्यात अपेक्षीत असणारा सरासरी १४१.६ मिमी पाऊसही जिल्ह्यात पडलेला नाही. वर्तमान स्थितीत केवळ ५२.७ सरासरी पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी ही ३७.१९ टक्के आहे. अर्थात जून महिन्यात ६३ टक्के पावसाची तूट जिल्ह्यात आहे. त्यामुळे येत्या काळात जर दमदार पाऊस जिल्ह्यात पडला नाही तर टँकरग्रस्त गावांसोबतच ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांनाही पाण्याच्या उपलब्धतेची समस्या भेडसाऊ शकते. त्यामुळे जून महिन्यात पावसाने एक प्रकारे जिल्ह्याला चकवल्या सारखेच आहे.जिल्ह्यात एक हजार १९५ पाणी पुरवठा योजना आहे. जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा सारख्या काही योजना वगळता अन्यत्र दमदार पाऊस न पडल्यास पाणीटंचाईची समस्या अधिक गडद बनू शकते असा कयास आहे. दरम्यान, २३ आणि २४ जून रोजी पडलेल्या पावसामुळे टँकरच्या स्थितीत काही बदल झाला काय? याची माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली.तालुका निहाय टँकरची संख्याबुलडाणा ४६, चिखली २७, देऊळगाव राजा २९, मेहकर ३०, लोणार १३, सिंदखेड राजा ३०, खामगाव ४३, शेगाव २७, संग्रामपूर १, मलकापूर ८, मोताळा २५, नांदुरा २१ या प्रमाणे तालुकानिहाय टँकरची संख्या आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात टँकरने त्रिशतक पार केले आहे. २८४ गावांना सध्या ३०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.९४३ विहिरी अधिग्रहीतटंचाईची दाहकता अद्यापही ग्रामीण भागात असून ६७६ गावांतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी ९४३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. दरम्यान, अधिग्रहीत करण्यात आलेल्या काही विहीरींना पाणीच उपलब्ध नसल्याने काही पर्यायी विहीरी प्रशासनास अधिग्रहीत कराव्या लागल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे.
टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई