शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

संशय करतो संसाराचा घात

By admin | Updated: September 21, 2014 00:38 IST

खामगाव तालुक्यातील परिस्थिती : महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये सहा महिन्यात ६२ तक्रारी.

अनिल गवई / खामगाव (बुलडाणा)थाटामाटात लग्न आटोपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालुक्यातील ६२ जणांच्या संसाराची गाडी रुळावरून उतरली. यापैकी तब्बल २९ जणांच्या सप्तपदीची गाठ केवळ संशयीवृत्तीमुळे सैल झाल्याचे चित्र आहे. वाढत्या घरगुती कलहामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच शासनाने सं पूर्ण राज्यात कलह उद्भवलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उ पक्रमांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये बुलडाणा येथील जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुउद्देशीय महिला मंडळाला ह्यसमु पदेशन केंद्रह्ण चालविण्यास परवानगी दिली. महिला दिन आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून १0 मार्च २0१४ रोजी या केंद्राचे रितसर उद्घाटन झाले. उद्घाटन झाल्या पासून आजपर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीत ६२ तक्रारी या केंद्रात दाखल आहेत.प्राप्त तक्रारींचा निपटारा करताना तब्बल २९ तक्रारी या चारित्र्याच्या संशयावरून असल्याचे वास्तव आहे. तर १४ दाम्पत्यांच्या वादाला मोबाईल कारणीभूत ठरल्याची वस्तुस्थिती आहे. याशिवाय सात दाम्पत्याच्या संसारात दोघांपैकी एकाच्या आईने मिठाचा खडा असल्याची परिस्थिती असून, १0 महिलांनी केवळ आकसापोटी तक्रार दाखल केल्याचे चित्र समोर आले आहे.