शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

बुलडाणा जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड!     

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 18:04 IST

जलस्त्रोतांनी तळ गाठला असून अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत.

ठळक मुद्देजलस्त्रोतांनी तळ गाठला असून अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत. फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी आटापीटा करावा लागत आहे.

बुलडाणा - जलस्त्रोतांनी तळ गाठला असून अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत. परिणामस्वरूप अनेक शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून फळबागा नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 

जिल्ह्यात पपई, आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, द्राक्ष, केळी यासह वेगवेगळ्या फळबागांची लागवड करण्यात येते. परंतू सध्या या फळबागांना दुष्काळाचा फटका बसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. खरीप हंगामा पाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेला. अल्प पावसामुळे फळबागांवरही पाणीटंचाईचे संकट आले आहे. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी आटापीटा करावा लागत आहे. बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्यामुळे शेतकरी टँकरने पाणी पुरवठा करून फळबागा जगवत आहेत. त्यामुळे हिरव्यागार दिसणाऱ्या बागा आता पाण्याअभावी जळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी तर या फळबागाच कुऱ्हाडीने नष्ट करण्याला सुरुवात केली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. संकटकाळातही काही शेतकरी विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मेहकर, लोणार व सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागांमधून लागलेला खर्चही निघाला नसल्याने संपुर्ण बागच नष्ट केल्याचे दिसून येते. 

उन्हामुळे पपईवर डाग

वाढत्या उन्हामुळे पपईवर डाग पडत असून, त्याची चवही बदलत आहे. परिणामी ग्राहक अशी पपई खरेदी करत नाहीत. या दुष्काळाचा मोठा फटका सध्या पपई या फळबागेला बसत असल्याची माहिती ऊमरा देशमुख येथील शेतकरी प्रशांत देशमुख यांनी दिली. पपईची अनेक झाडे उन्हामुळे वाळली असून ते कुऱ्हाडीने तोडण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. 

डाळींबाची साडेपाचशे झाडे नष्ट!

सिंदखेडराजा - दुष्काळात डाळींब बाग जगविणे अवघड झाल्याने गोरेगाव येथील शेतकरी अविनाश पंचाळ यांनी एक हेक्टर शेतामध्ये डाळींबाच्या ५५० झाडावर  कुऱ्हाड चालवून संपूर्ण बागच नष्ट केली. अविनाश पंचाळ यांनी अल्प भूधारक शेतकरी असून त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत डाळींब बागायतीचा निर्णय घेतला. डाळींब पिकवून लाखोचे उत्पन्न घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावरच दुष्काळाच्या झळा बसल्या. डाळींब बागेसाठी त्यांची ठिबक सिंचनाकरीता सुमारे १ लाख ५० हजार रुपये खर्च केले. विहिरीचे खोलीकरणही केले. नंतर हिमायतबाग औरंगाबाद येथील शासकीय रोपवाटिकेतील भगवा जातीची डाळींब रोपांची लागवड केली. झाडे वाढविली, फुलविली. पाणी कमी पडू नये, म्हणून बोअरवेल घेतली. परंतू सततच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी फळबागांवर संकट आले. कांही दिवसापूर्वी हिरव्यागार दिसणाऱ्या फळबागा पाण्याअभावी सूकू लागलेल्या पाहून शेतकऱ्यांचे चेहरेही सूकू लागले आहेत. अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. बोअरवेलला पाणी लागत नाही. बागा जगविण्यासाठी केलेला खर्च ही निघणे अशक्य झाल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdroughtदुष्काळFarmerशेतकरी