शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ४७८ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:16 IST

शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.


- नीलेश जोशी  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने तब्बल ४७८ कोटी रुपयांचे खरीपाचे नुकसान केले असून सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे आता पूर्णत्वास गेले असून शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.
दरम्यान, प्रसंगी या नुकसानामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पाऊस पडला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पडणारा परतीचा आणि अवकाळी पावसाची साधारणस्थिती पाहता त्यातुलनेत हा पाऊस तब्बल २१८ टक्के पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक खराब झाले तर शेतात लावून ठेवलेल्या पिकाच्या सुड्या या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. एकट्या मेहकर परिसरातील दीडशेपेक्षा अधिक सुड्या पैनगंगा नदीत वाहून गेल्या होत्या. लोणार तालुक्यातही जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान सुड्या वाहून गेल्यामुळे झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४५० कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या तीन सदस्यीय समितीच्या माध्यमातून १३ ही तालुक्यात १४२० गावात नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन पंचनामे करण्यात आले होते. या पावसामुळे झालेल्या नुकसानाची व्याप्ती फार मोठी होती. प्रत्यक्ष बांधावर जावून हे नुकसान पाहणाºया कारेगाव येथील एका शेतकरी महिलेचा शेतातच मृत्यू झाल्याची ह्रदय द्रावक घटना घडली होती. एकंदरीत या नुकसानामुळे शेतकरी पुरता हादरून गेला होता.
जवळपास १५ दिवस अख्खा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानाची पाहणी करत होता. त्याचा अंतिम अहवाल आता पूर्णत्वास गेला असून बुधवारी किंवा गुरूवारी तो विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर राज्यशासनास हा अहवाल जाईल तेथून केंद्राकडे राज्याचा अहवाल जावून केंद्राचे पथकही जिल्ह्यात पाहणीस येईल. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांच्या हातात नुकसान भरपाई पडेल. यासाठी किती काळ लागले हे तुर्तास सांगता येणार नाही. मात्र १५ डिसेंबरच्या आसपास त्यादृष्टीने प्रत्यक्ष हालचाली होवू शकतात, असा अंदाज आहे.
 
अशी असेल नुकसान भरपाई
यामध्ये प्रामुख्याने जिरायती क्षेत्रासाठी सहा हजार ८०० रुपये प्रतीहेक्टरप्रमाणे तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतीहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासंदर्भाती स्थायी आदेश व २०१५ अनुषंगीक विषयान्वये करण्यात आलेल्या काही बदलांचा विचार करून ढोबळमानाने शेतकºयांना नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रप्रती राजवट पाहता प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात नेमकी कधी ही नुकसानाची रक्कम पडेल हा मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी