शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

अवकाळी पावसात धानासह कडपा ओला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 5:00 AM

गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणाने अळींचा प्रादूर्भाव वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात तूर पीक सलग पद्धतीने न घेता बांधावर घेतली जाते. घरी खाण्यापुरती तूर शेतात लावली जाते. परंतु आता या ढगाळ वातावरणाने तूर नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत हतबल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देथंडीचा जोर वाढला : दोन दिवसांपासून ढगाळी वातावरणाने शेतकरी धास्तावला

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसात आधारभूत केंद्रावरील धानासह कडपा ओला झाला आहे. थंडीचा जोर वाढला असून ढगाळी वातावरणाने शेतकरी धास्तावला आहे. पावसाने मळणीचे काम ठप्प झाले असून काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून दुपारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री भंडारा शहरासह अनेक भागात पाऊस कोसळला. शुक्रवारीसुद्धा संपूर्ण दिवसभर ढगाळी वातावरण दिसून आले. वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. सध्या शेतशिवारात धान मळणीचे काम वेगात सुरू आहे. परंतु या अवकाळी पावसाने संपूर्ण काम ठप्प झाले आहे. काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अनेकांकडे ताडपत्री व इतर साधने नसल्याने धान ओला होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपला धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर नेला आहे. तो धानही ओला होण्याची भीती आहे. पावसाळी वातावरणाने शेतकरी धान झाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता धान घरी येत असतानाही या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा संकटात टाकले आहे. गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणाने अळींचा प्रादूर्भाव वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात तूर पीक सलग पद्धतीने न घेता बांधावर घेतली जाते. घरी खाण्यापुरती तूर शेतात लावली जाते. परंतु आता या ढगाळ वातावरणाने तूर नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत हतबल झाल्याचे चित्र आहे.

आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांची धावपळअवकाळी पावसाची टांगती तलवार असून हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी धान घेवून गेलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. पावसाने धान ओला झाल्यास त्याचा दर्जा खालावतो. प्रसंगी ओले झालेले धान पाखर होताच आणि या धानाला कोणतीही किंमत राहत नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोजणीचा वेग वाढवावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस