शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते. कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील महिन्यात परतीच्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : भंडारातील बाजारात कांद्याचे भाव ६० रुपये किलो

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने विदर्भात सर्वत्र हाहाकार माजला आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. नवीन कांदा पावसात सापडला असून अनेक ठिकाणी काढणीही लांबणीवर पडली आहे. परिणामी, कांद्याचा भाव चढला असून, कांदा आता ६० रुपयाच्या घरात पोहचला आहे.
भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते. कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील महिन्यात परतीच्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा येण्यास सुरुवात होते.
बाजारात थोड्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक होत आहे. हा कांदा ६० रुपयांच्या जवळपास पोहचला आहे. अनेक हेक्टरवर अजूनही कांद्याचे पीक आहे. ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. बाजारात व्यापाऱ्यांकडे जुना कांदा शिल्लक आहे. जुना कांदा खराब झाला असल्याने व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र चांगल्या जुन्या कांद्याला भाव आला आहे.
भंडारा येथील गंज बाजार तसेच मोठा बाजारमध्ये ठोक विक्रेत्यांशी संपर्क साधला असता, पांढरा कांद्याचे भाव वाढत असल्याने लाल कांद्याची मागणी तसेच विक्री वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. लाल कांद्याची मागणी पांढऱ्या कांद्याच्या तुलनेमध्ये लाल कांद्याचे भाव कमी असल्यामुळे बाजारामध्ये लाल कांदा मोठया प्रमाणात विक्रीला आला आहे. विशेष म्हणजे, मार्केटमध्ये पांढरा कांदा खराबच येत असल्यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. एकंदरीत काद्यांच्या वाढलेल्या भावाने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

टॅग्स :onionकांदा