शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानासाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:17 IST

पाणी हे जीवन असून मानवी उपद्रव्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोताची पातळी खोल गेल्याने सर्वांना जलसंकटांचा सामना करावा लागत आहे.

आलेसूर येथील उपक्रम : वाघमारे यांचाही सहभागलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाणी हे जीवन असून मानवी उपद्रव्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोताची पातळी खोल गेल्याने सर्वांना जलसंकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून लोकसहभागाच्या योजना सुरु केल्या आहेत. या माध्यमातून जनतेच्या श्रमदानातून जलसंवर्धनाचे भरीव केले जात असून याला लोकचवळीचे स्वरुप आले असल्याने सर्वांनी एकत्र येवून श्रमदानातून जलसंवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी आलेसूर येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तुमसर तालुक्यातील आलेसूर येथील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्र. ४० मधील वन तालावातील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प. सदस्य संदीप ताले, पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सरपंच गोपिका मेहर, उपसरपंच संजय इळपाचे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल मडावी, ग्रा.पं. सदस्य खुशाल राऊत, नंदलाल खंडाते, वनक्षेत्र सहाय्यक श्रीराम केकान, ग्रामसेवक भारत जिभकाटे, रामचंद्र राऊत, दुर्गाप्रसाद भट, अशोक वाढीवे, निलेश श्रीरंग, वनसमिती अध्यक्ष नारायण पारधी, राजेश चौधरी, निलकमल पारधी, आशा वाघाडे, बबिता सलामे, स्वा.करमरकर, प्रकाश कोहळे, ओम करमरकर, हेमराज मेहर, बालचंद सोनवाने, भीवाराम मेहर, मंगला आहाके व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांसोबत तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान करून ट्रॅक्टरमध्ये गाळ फेकण्याचे काम केले. या तलावातील गाळ काढल्यामुळे तलावातील पाण्याच्या संचयास वाढ होईल व शिवारात गाळ टाकल्यामुळे शेतातील पिक जोमदार येतील. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होवून फायदा होईल. वनतलावात पाणी साचल्याने वनप्राण्यांना पाण्याची दीर्घकाळ सोय होवून वनप्राण्याचे त्यामुळे संवर्धनही करण्यात मदत मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक दायीत्व पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावे असे आ.चरण वाघमारे यांनी उपस्थितांना आवाहन केले. यासाठी श्रमदान करण्यासाठी गावातील महिला व पुरुष तसनवर्ग विविध मंडळानी सक्रीय सहभाग घेत ४१० गावकरी व वनतलावातील सर्व कर्मचारी यांनी वनतलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. हा अभिनव उपक्रम राबविल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.