शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

कालवा दुरुस्तीसाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली दिसून येत नाही.

ठळक मुद्देवाकेश्वरच्या नागरिकांचा पुढाकार : पाटबंधारे विभागाच्या मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाच्या गर्भावस्थेत पाण्याची नितांत गरज असून वाकेश्वर येथील अनेक शेतकरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी विनवणी करीत आहे. परंतु अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली दिसून येत नाही.
अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी असतांना देखील यातून मार्ग निघत नसल्याने गावातील बापू डहाके यांनी पुढाकार घेत गावकºयांना मनातील संकल्पना बोलून दाखविली. त्यानुसार गावातील मंदिरात एकत्र येत अनेकानी लोकवर्गणी जमा करुन स्वत: पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील गावकºयांच्या पुढाकाराने मुख्य कालव्या वितरिकेला पडलेल्या भगदाडासह इतर ठिकाणच्या दुरुस्तीसाठी जेसीबी बोलावून स्वत: गावकऱ्यांनी श्रमदान करत दोन दिवसात काम पूर्ण केले. गावातील अनेक तरुणांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.
गावकºयांनी तात्पुरत्या स्वरुपाची जरी दुरुस्ती केली असली तरी लाखो लिटर होणारा पाण्याच्या अपव्यय थांबविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकार पाणी अडवा पाणी जिरवासाठी जनजागृती करीत असले तरी देखील वाकेश्वर येथील गावकऱ्यांनी स्वत:चा आचरणातून कालव्याची दुरुस्ती करीत प्रशासनापुढे एक आदर्श ठेवला आहे. पाटबंधारे विभागाला आतातरी शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव होणार काय? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक