शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवाना कृषीचा, वापर अवैध धंद्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्यात कृषीसाठी उचल केलेला ट्रॅक्टरचा इतर कामांसाठी अवैध व्यवसायासाठी वापर होत आहे. यातून लाखो रूपये मिळत असल्याने कृषीला व्यवसायाला फाटा देत रेतीतस्करी, उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. वर्षानुवर्ष लाभ घेतलेल्या या वाहन धारकांवर कुठेही कारवाई होत नसल्याने त्यांना रान मोकळे झाले आहेत.

ठळक मुद्देगौण खनिज तस्करीचे लागले ग्रहण । महसूल, पोलीस, कृषी विभागाचे सातत्याने दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध विभागाच्या योजना राबविल्या जातात. शासकीय योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या ट्रॅक्टरची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा वापर शेती व्यवसायाकरिता करणार आहे, अशी नोंदणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात या वाहनांचा अवैध धंद्यासाठी वापर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. यामुळे खरे गरजू शेतकरी अशा शासकीय योजनेपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूरसह परिसरात रस्त्यांवर असे वाहन सर्रासपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर तसेच इतर अवजारे योजनेचा लाभ दिला जातो. या माध्यमातून लाखो रूपयांची सबसीडी शेतकऱ्यांना दिली जाते. शेतकऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर उचलून प्रत्यक्षात इतर काही जण लाभ उचलत आहेत. शेती व्यवसायासाठी वापर न करता रेती तस्करी तसेच गौण खनिज वाहतुकीसाठी प्रत्यक्षात वापर होत असल्याचे बहुतांश ठिकाणी तालुक्यात दिसून येत आहे.
लाखनी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे. कृषी योजनेंतर्गत घेतलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग खºया अर्थाने शेती कामांसाठी होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शासनाची दिशाभूल करत अवैध धंद्यासाठी वापर करणाºया अशा वाहन चालकांवर अधिकाºयांनी कारवाई करण्याची गरज आहे. अनेकजण शेतीचा सातबारा जोडून कृषी विभागाच्या यांत्रीकीकरण योजनेचा लाभ घेतात. यामध्ये अनेक कंत्राटदार, बिल्डर, रेती माफिया सर्वाधिक आहेत. त्यामुळे खरे शेतकºयांवर मात्र अन्याय होत आहे.
यामुळे लाखोंचा महसूल बुडत असून कित्येक वर्षापासून हे प्रकार सर्रास सुरू आहे. याकडे प्रशासनाचे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून होत आहे. रस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे. त्यांच्या कागदपत्रांची पाहणी करून लाभ दिलेल्या शेतकºयांना तसेच वाहन धारकांची वारंवार तपासणी करून सर्व विभागांनी कारवाई करुन कायद्याचा बडगा दाखविण्याची गरज आहे. मात्र अशा तपासण्या कुठेही वर्षानुवर्ष होत नसल्याने या प्रकारात वाढ होत असल्याचे दिसत आहे.
लाखनी तालुक्यात कृषीसाठी उचल केलेला ट्रॅक्टरचा इतर कामांसाठी अवैध व्यवसायासाठी वापर होत आहे. यातून लाखो रूपये मिळत असल्याने कृषीला व्यवसायाला फाटा देत रेतीतस्करी, उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. वर्षानुवर्ष लाभ घेतलेल्या या वाहन धारकांवर कुठेही कारवाई होत नसल्याने त्यांना रान मोकळे झाले आहेत.
विविध योजना राबवण्यासाठी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. मात्र अवैध व्यवसायीक मात्र याच संधीचा फायदा उचलत शेतकºयांच्या नावावर ट्रॅक्टरची खरेदी करुन प्रत्यक्षात शेती कामासाठी ट्रॅक्टरचा उपयोग न करता मुरूम उत्खनन, मातीकाम, रेतीवाहतूक कामांसाठी उपयोग करीत आहेत.

शासनाच्या योजनांचा गैरफायदा
शासनाकडून ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी अनेक शेतकरी अर्ज देखील करतात. मात्र प्रत्यक्षात काही जण योजनांचा लाभ उठवत असल्याने खºया अर्थाने शेतकरी आजही वंचितच राहत आहेत.

टॅग्स :agricultureशेती