शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाच्या पत्राचा प्रवास बारा दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST

मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. ...

मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. यावरून प्रशासन किती निष्काळजीपणे वागते त्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. एका सेकंदात इकडचे पत्र तिकडे होते, अशी माध्यमे उपलब्ध आहेत. परंतु, अजूनही प्रशासकीय पत्र घेऊन डाकसेवक जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात दररोज येत-जात असतात. त्यामुळे काही महत्वाची पत्रं प्रशासनाच्या आवक-जावक विभागात पडून राहतात, याचा प्रत्यय नुकताच आला. कान्हळगाव (सीरसोली) येथील ग्राम रोजगार सेवकांची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती भरण्याच्या कामाची संगणक चाचणी घेण्यात यावी, अशी तक्रार शासनाकडे करण्यात आली होती. याबाबतचे विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र शासनाकडून पृष्ठाकंन पत्र २५ नोव्हेंबर २०२० रोजीचे पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा यांना मिळाले. त्यांनी विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्र्यांचा संदर्भ देत ३१ डिसेंबर २०२० रोजी मोहाडी तहसील कार्यालयाला पत्र पाठवले. परंतु, ते पत्र तहसील कार्यालय, मोहाडी येथे १२ जानेवारीला आवकमध्ये आले. ते पत्र कान्हळगाव येथील तलाठय़ांना १५ जानेवारी रोजी देण्यात आले. त्यानंतर ते पत्र तक्रारकर्ता शंकर शेंडे यांना देण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी तक्रारी संबंधात ७ जानेवारी २०२०ला जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे तक्रारकर्त्याला दस्तऐवजासह उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, ती तारीख आधीच निघून गेली होती. पत्र मात्र तक्रारकर्त्याला तेरा दिवस उशिरा मिळाले. त्यामुळे संबधित पत्रावर सुनावणी होऊ शकली नाही. आता प्रश्न, पत्र उपजिल्हाधिकारी यांच्याकडून उशिरा पाठविण्यात आले की, मोहाडी तहसीलमध्ये तो पत्र पंधरा दिवस पडून होते, याचा तपास प्रशासनाने केला पाहिजे. तथापि, सहायक जिल्हाधिकारी व परिविक्षाधीन तहसीलदार मीनल करनवाल यांनी हे पत्र १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले तर तलाठय़ांनी १५ जानेवारी रोजी ते पत्र देण्यात आले, असे पत्रावर लिहून स्वाक्षरी केली आहे.