शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लहान महादेव गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

१९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लहान महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसर तालुक्यातील गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला असून, येथे आतापर्यंत राज्य शासनाने केवळ ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग म्हणून १९९९ मध्ये मंजुरी दिली; परंतु तीर्थक्षेत्राचा विकास झाला नाही.सातपुडा पर्वत रांगात निसर्गसौंदर्याने नटलेले गायमुख प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, तुमसरपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. यात्रेला २०० वर्षांचा इतिहास आहे. भंडाऱ्याचे दिवंगत यादवराव पांडे यांच्या काळापासून यात्रा भरत असून, पांडे यांची नवीन पिढी व जिल्हा प्रशासनातर्फे येथे यात्रेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येते. १९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. महाशिवरात्रीला येथे मध्य प्रदेश व विदर्भातून मोठ्या संख्येने येथे भाविक येतात. मात्र येथे सुविधा नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.गायमुख येथे जाण्यासाठी असलेला रस्ता उखडला असून भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासाकडेही दुर्लक्ष आहे.

गायमुख यात्रेचा इतिहास - प्राचीन काळी येथे एक ऋषीने भगवान शिवाची तपस्या केली. त्यामुळे स्थळ पवित्र असल्याचे मानले जाते. येथे पंचमुखी भोलाशंकर, हनुमान, मकरध्वज, अंबाबाई, गोरखनाथाचे मंदिर असून, पंचमुखी भोलाशंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे. पार्वतीची प्राचीन विहीर पहाडावर असून, भाविक येथे भेट देतात. पलीकडील जंगलात मिनी नैनिताल, पांगडी जलाशय डोळ्यांचे पारणे फेडून जाते. गाईच्या मुखातून पर्वतीय झरा सतत वाहून एका जलकुंभात पडते. यावरून या स्थळाचे नाव गायमुख असे पडले आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटन