शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

नृसिंह टेकडीचा पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:49 AM

शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.

ठळक मुद्देएक कोटी ८० लाखांच्या विकास कामांना मंजूरी : मिळाले केवळ ५० लाख, उर्वरीत निधी केव्हा मिळणार?

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी व तुमसर तालुक्याच्या सीमेवरील देव्हाडा - माडगी पर्यटनीय तिर्थस्थळाच्या विकासासाठी राज्य पर्यटन विकास निधीतून विविध कामांसाठी सुमारे एक कोटी ८९ लाखांचा निधी तीन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला. परंतु शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.मोहाडी - तुमसर तालुक्याच्या सीमेवर वैनगंगा नदीपात्रातील बेटावर निर्मित भगवान नृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. या स्थळाला धार्मीक व पर्यटनीय महत्व आहे. पूर्व विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थळाच्या विकासासाठी अनेकांनी आश्वासनांची खैरात वाढली. मोठमोठ्या निधीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्ष निधी खेचून आणण्यात दमछाक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे स्थळ पर्यटनीय विकासापासून वंचित राहिला. कार्तिक पौर्णिमेला येथे १५ दिवसांची भव्य यात्रा भरते. या स्थळाला ऐतिहासिक महत्व असून पूर्व विदर्भात हजारो भाविक दरवर्षी येथे येतात.मंजूर पर्यटन विकास निधीचा पहिला २० लाखांचा टप्पा मिळाला. दुसºया टप्प्यात नुकताच ३० लाखांचा निधी प्राप्त झाला. प्राप्त एकूण ५० लाखांच्या निधीतून डांबर रस्ता, नाली बांधकाम, सेफ्टी वॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तीन वर्षात विकास निधी केवळ ५० लाख रुपयांचा मिळाला. निवडणुकासमोर असल्याने सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांंच्या निधींची घोषणा करण्याचा सपाटा चालविला आहे. आश्वासनानंतर आश्वासने दिली जात आहेत. परंतु पाच वर्षापूर्वी निवडणुकीत मुंढरी ते रोहा पुलाच्या निर्माणाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाहीत. बंद पडलेले उद्योग सुरु झालेले नाही. नृसिंह टेकडीसाठी पुरेसा निधी खेचून आणला गेला नाही. आता चौंडेश्वरी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासासाठी दोन कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगून भूमिपूजन उरकण्यात आले. परंतु निधी पूर्ण मिळणार काय? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांचा आहे.राज्य शासनाच्या पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी उर्वरित एक कोटी ३९ लाखांचा निधी मिळणे गरजेचे होते. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु मोठ्या निधीची घोषणा करून पाठ थोपटण्यात धन्यता मानली जात असल्याने नृसिंह टेकडीचा पर्यटनीय विकास रखडला आहे. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेला आहे.पर्यटनासाठी सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.उर्वरीत विकास कामांना लागला 'ब्रेक'राज्याच्या पर्यटन विकास निधीतून स्थळापर्यंत जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण, सीमेंटीकरण, नाली बांधकाम, सायकल स्टँड, सेफ्टीवॉल, सभामंडप, किचनरुम, अतिथीगृह, शौचालय व वॉशरुम आदी कामे केली जाणार आहे. ५० लाखांच्या निधीतून डांबररस्ता, नाली बांधकाम, सेफ्टीवॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. उर्वरीत कामांना निधीअभावी 'ब्रेक' लागला आहे.

टॅग्स :Templeमंदिर