शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या आरोग्यासाठी झटणारा नि:स्वार्थ सेवाकर्मी

By admin | Updated: July 1, 2014 01:19 IST

‘स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्’ हे आयुर्वेदातील ब्रीद अंगी भिनवून भंडाऱ्यातील एक आयुर्वेदिक डॉक्टर नित्यनेमाने दररोज लोकांना सेवा देत आहे. जो-जो त्यांच्या रुग्णालयात जातो त्या-त्या

आज ‘डॉक्टर्स डे’ : वनस्पतीच्या फळ, फुले, पाने, मुळे, साल, बियांपासून तयार करतात औषध
भंडारा : ‘स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्’ हे आयुर्वेदातील ब्रीद अंगी भिनवून भंडाऱ्यातील एक आयुर्वेदिक डॉक्टर नित्यनेमाने दररोज लोकांना सेवा देत आहे. जो-जो त्यांच्या रुग्णालयात जातो त्या-त्या रुग्णाला सेवा देण्यात ते कुठलीही कसर सोडत नाहीत. रुग्णांनी पैसे दिले तरी ठीक नाही दिले तरी ठीक. परंतु कर्तव्यात कसूर करायची नाही, असा त्यांचा धर्म. आजच्या काळात साध्या आजाराचेही भरमसाठ शुल्क घेणाऱ्या डॉक्टरांच्या दुनियेत आज ‘डॉक्टर्स डे’ च्या पार्श्वभूमीवर या सेवाव्रतीचे कार्य मोलाचे ठरणारे आहे.
विश्वनाथ नागदेवे असे या सेवाव्रती आयुर्वेदीक डॉक्टरचे नाव. भंडारा येथील मोठा बाजार चौकात भाड्याने घेतलेल्या आठ बाय आठच्या छोटेशा खोलीत ते नाडी तपासून औषध देतात. सकाळी १० ते सायंकाळी ५ असा त्यांचा दिनक्रम आहे. आपण आयुर्वेदाकडे कसे वळले, या प्रश्नावर ते म्हणाले, जेव्हा कळू लागले तेव्हापासूनच आयुर्वेदाची ओढ लागली.
वयाच्या २० व्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे वनस्पती औषधाचे गाढे अभ्यासक चंदूबाबा धोटेकर यांना भेटलो. चंदूबाबा वनस्पतीच्या फळ, फुले, पाने, मुळे, साल, बिया आदीपासून औषध तयार करुन गोरगरीब रुग्णांना औषध द्यायचे. आपणही त्यांच्याकडे राहून ज्ञान घ्यायचे आणि आपल्या गावात सेवा द्यायची, असा त्यांनी निर्धार केला.
पाच-सहा वर्षे त्यांच्याकडे राहून त्यांनी औषधोपयोगी वनस्पतीचे ज्ञान घेतले. त्यानंतर भंडाऱ्यात निशुल्क सेवा कार्य सुरू केले. त्यावेळी लोक त्यांची चेष्टा करायचे. परंतु त्यांनी चेष्टेला कधी थारा दिला नाही. मोफत सेवा कार्य सुरू असतानाच रुग्णांची गर्दी होऊ लागली.
त्याच काळात त्यांना मोहाडीचे तुर्रीबाबा पात्रे यांनी ‘आता तु मोफत सेवा देऊ नकोस’ कारण लोकांना फुकटचे मोल नसते, असा मित्रत्वाचा सल्ला दिला. त्यानंतर नागदेवे यांनी नाममात्र शुल्क घेणे सुरु केले. तरीसुद्धा ते रुग्णांनी दिले तेवढ्या शुल्कावर समाधान मानतात. रुग्णांना औषध कशा पद्धतीने घ्यायचे हे ज्या कागदावर लिहून देतात त्यावर काविळ, उच्च रक्तदाब, श्वेतप्रदर या आजाराचे मोफत औषध दिले जात असल्याचे लिहून ठेवले आहे.
मोफत औषधी देता तर उदरनिर्वाह कसा होतो यावर ते म्हणाले, माझ्या गरजा कमी आहेत. त्यामुळे खर्च कमी आहे. शेती असल्यामुळे आर्थिक विवंचनेचा प्रश्न नाही, परंतु आपल्या सेवेने लोकांचे कल्याण होत असेल तर वाईट काय? असा त्यांचा प्रतिप्रश्न आहे.
२०१३ मध्ये गडचिरोली वनविभागाने वनस्पतीपासून वनौषधी तयार करण्याची योजना आखली. त्यासाठी विदर्भातून वनस्पती अभ्यासकांना बोलाविले. त्यात विश्वनाथ नागदेवे हे अग्रक्रमावर होते. त्यांच्याकडून जंगलातील वनस्पतींची माहिती जाणून घेतली. त्यांनी औषधोपयोगी वनस्पतीच्या नावासह फळ, फुले, पाने, मुळे, साल, बियांपासूनचे औषध कोणत्या आजारासाठी उपयुक्ततेची माहिती दिली. त्यानंतर आता वनविभागाने वनौषधी तयार करुन बाजारात विक्रीला आणले आहे.
भंडाऱ्यात राहून आयुर्वेदीक सेवा देणाऱ्या नागदेवे यांच्याकडे चंद्रपूर गडचांदूर, अमरावती, यवतमाळ, नागपूरसह तेलंगणातील आदिलाबाद, छत्तीसगडमधील भिलाई, रायपूर, मध्यप्रदेशातील जबलपूर, बालाघाट, बैतूल, मय्यर येथून रुग्ण येत असतात. इतक्या दूरवरुन येणारे रुग्णांनी पैसे दिले तर घ्यायचे नाही तर ‘स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्’ असे म्हणत सेवा करायचे असा त्यांचा नित्यक्रम सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)