शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:32 IST

भंडारा : कोराेना महामारीने वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात ...

भंडारा : कोराेना महामारीने वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ पर्यंतवीच्या १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण केले जाणार आहे. एकीकडे शासन शिष्यवृत्तीची परीक्षा घेणार आहे मात्र शाळेची परीक्षा घेणार नाही, हे कसले धोरण याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात ७० हजार ६४५ मुलगे, तर ६५ हजार ७६१ मुली असे एकूण १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थी आहेत. यात इयत्ता १ ते ५ ची विद्यार्थी संख्या ४२ हजार ६९५ असून, इयत्ता ६ ते ८ मध्ये २७ हजार ९५० विद्यार्थी आहेत. याचप्रमाणे इयत्ता १ ते ५वीमध्ये ३९ हजार ५११ विद्यार्थिनी असून, इयत्ता १ ते ८ मध्ये २६ हजार २५० विद्यार्थिनींची संख्या आहे. अभ्यास न करता पुढच्या वर्गात जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, कोरोनामुळे आपला पाल्य मागे पडत आहे, आता शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार असल्याने मग इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा का घेण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पालक आपल्याच विवंचनेत असल्याचे दृश्य आहे. विद्यार्थी अभ्यास न करता ते पुढच्या वर्गात जात आहेत. यंदा कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सुरू झालेल्या शाळांना बंद करण्यात आले. शाळा सुरू झाल्यावर सर्वच बेजबाबदारपणाने वागू लागल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. परिणामी सुरू झालेल्या शाळा बंद करण्याची वेळ शासनावर आली आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे. जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाने घेतलेला निर्णय विचार करूनच घेतला आहे.

- आशिष मेश्राम,

मुख्याध्यापक, जि.प.शाळा, मुंढरी खु.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना एकत्रित बसवून परीक्षा घेणे शक्य नाही. शिष्यवृती परीक्षेत विद्यार्थी संख्या कमी असेल. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे, असे वाटत नाही. जीवन जगू तरच आपण समोर शिकू.

-बाळासाहेब मुंडे,

शिक्षक, जि.प. शाळा, वरठी

शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा उत्तीर्ण केले जाणार आहे. आता १० वी वगळता ११ वी पर्यंतच्या सर्व मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे स्वागतच करावे लागेल.

-केशर बोकडे, मुख्याध्यापिका, शास्त्री विद्यालय, भंडारा

पालक काय म्हणतात...

कोरोनामुळे शासनाने वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही. परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

- हेमकृष्ण वाडीभस्मे, पालक, साकोली

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्याय नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी असा पालकांचा आग्रह आहे.

- तुकडूदास दुधबरैय्या, पालक, भंडारा

ही ढकलगाडी काय कामाची

अभ्यास न करता व परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केले जाते. ही ढकलपास गाडी काय कामाची, असा प्रश्न सर्वांच्या समोर येतो. एकही धडा न वाचता पुढच्या वर्गात जाण्याची संधी देणे म्हणजे विद्यार्थ्यांना खुळे बनविण्यासारखेच आहे. शिक्षणाची प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. पहिल्या वर्गापासूनचे शिक्षण तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे पदवीचे शिक्षण आहे.