शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पावसाने शेवटच्या चरणात गाठली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 5:00 AM

जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. यंदाही या लहरीपणाचा फटका बसला. हवा तेव्हा पाऊस बरसला नाही आणि आता शेवटच्या चरणात धाे-धाे बरसत आहे. गत पंधरा दिवसांत २१५ मिमी पाऊस काेसळला असून आतापर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. या पावसाने जवळजवळ सरासरी गाठली असली तरी हलक्या धानाला मात्र फटका बसत आहे.भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधी १२४१ मिमी पाऊस अपेक्षित असताे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. हा पाऊस विद्यमान सरासरीच्या ९१ टक्के आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के सरासरी पावसाची नाेंद झाली हाेती. मात्र, शेवटच्या चरणात जाेरदार पाऊस बरसला. त्यामुळे सरासरी वाढली आणि प्रकल्पही तुडुंब भरले आहेत.जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला. १० सप्टेंबरनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. मात्र, या पावसाचा फटका हलक्या धानाला बसला. लाेंब्या आलेला धान जमिनीवर झाेपला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात तर माेहाडी आणि तुमसर तालुक्यात अतिवृष्टी झाली. या शेवटच्या चरणातील पावसाने सरासरी गाठली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. धान काढणीला आला असताना पाऊस काेसळत असल्याने नुकसान हाेण्याची माेठी भीती आहे.

सर्वाधिक पावसाची नाेंद माेहाडी तालुक्यात- जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस माेहाडी तालुक्यात १४४३.८ मिमी काेसळला आहे. हा विद्यमान सरासरीच्या १२२ टक्के आहे. त्या खालाेखाल साकाेली तालुक्यात १२२०.९, लाखनी ११९३.३, लाखांदूर ११०५.६, तुमसर ९७६.६ आणि भंडारा तालुक्यात ९६७.३ मिमी पाऊस काेसळला.  २१ सप्टेंबर राेजी तर माेहाडी तालुक्यावर आभाळच फाटले हाेते. अवघ्या २४ तासांत १४०.५ मिमी पावसाची नाेंद झाली.  इतर तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस