शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

दराअभावी उच्च प्रतीची धान खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:30 AM

पवनी तालुक्यात कोंढा परिसर धानाचे कोठार आहे. परिसरात मुख्य पीक धान असून शेतकरी साधारण, उच्च प्रतीचे धान घेत असतात. ...

पवनी तालुक्यात कोंढा परिसर धानाचे कोठार आहे. परिसरात मुख्य पीक धान असून शेतकरी साधारण, उच्च प्रतीचे धान घेत असतात. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली, पण त्या धानाला २२०० पेक्षा जास्त भाव मिळताना दिसत नाही. यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे धानाचे उत्पादन अत्यल्प झाले. किडीच्या प्रादुर्भावामुळे तीन, चार वेळा कीडनाशक फवारणी करून काही उपयोग झाला नव्हता. एकरी १० पोती धानदेखील झाले नाही. त्यातच उच्च प्रतीच्या धानास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

साधारण धान आधारभूत केंद्रावर शेतकरी विकतात. त्यास १८०० रुपये भाव व ७०० रुपये बोनस असे २५०० रुपये क्विंटल दर पडते. उच्च प्रतीचे धान २२०० रुपये विकले जात आहे. शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यास देखील विकण्यास अडचण जाते आहे. घरगुती ग्राहक यांनी खाण्यास चार हजार रुपयांप्रमाणे तांदूळ घेतले. पण उच्च प्रतीचे तांदळास मार्केटमध्ये मागणी तेवढी नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी, उपबाजार समितीत येथे धान पडून आहे. त्यास ग्राहक मिळताना दिसत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धानाचे तांदूळ राईस मिलमध्ये केले त्यांना ग्राहक मिळत नाही. मालाचा उठाव होत नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न पडला आहे. पवनी तालुक्यातील ७९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने पीक विमा योजना याचा फायदा मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतीत शासनाने अद्यापही घोषणा केली नाही. चौरास भागातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. धान पिकातून जे पैसे मिळतात त्याचा उपयोग शेतकरी बँक, सहकारी संस्थाचे कर्जफेड करीत असतात. यावर्षी कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. धानाला योग्य दर देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.