शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तहकूब सभांमुळे वाढले भ्रष्टाचाराचे प्रमाण

By admin | Updated: June 27, 2016 00:35 IST

ग्रामीण विकासासाठी राज्यघटनेने ग्रामसभेला विशेष अधिकार प्रदान केले आहेत.

सभेबाबत अनास्था : ग्रामसभेचा हेतू यशस्वी होण्यात अडचणीराहुल भुतांगे  तुमसरग्रामीण विकासासाठी राज्यघटनेने ग्रामसभेला विशेष अधिकार प्रदान केले आहेत. मात्र ग्रामसभेला असणारी उपस्थिती पाहता ग्रामसभेचा हेतू यशस्वी होण्यात अडचणी येत आहेत. गणसंख्येअभावी तहकूब होणाऱ्या सभांचे प्रमाण वाढू लागल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.आजही ग्रामीण भागात बहुतांश नागरीक ग्रामसभेविषयी अनभिज्ञ आहेत. ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभेत काय चालते? ग्रामसभेचे फायदे काय? ग्रामसभेची कार्ये कोणती? यासह अनेक प्रश्न हे ग्रामस्थांनी अजूनही अनुत्तरीतच आहेत. ग्रामस्थांनी निवडून दिलेले सदस्य ग्रामपंचायत चालवत असतात. परंतु ग्रामपंचायत ही मतदारांची संख्या असून ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या गावातील मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेला हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत मांडण्याचा प्रत्येक ग्रामस्थाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास करणे किंवा नाकारण्याचा अधिकार हा ग्रामसभेत हजर असणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला आहे. हे अधिकार बजावणे प्रत्येक ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. ग्रामसभा या आजघडीला सत्ताधारी किंवा विरोधकांना गावपातळीवर श्रेयवादाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध होवू लागल्या ओत. ग्रामसभेत हजर राहून सुधारणा सूचविण्याऐवजी तसेच टीकाटिप्पणी करून गावातील नेत्यांचा रोष पत्करण्यापेक्षा ग्रामसभेला जाणे टाळण्यातच ग्रामस्थ धन्यता मानत आहेत. काही ठिकाणी पूर्ण बहुमतात असणाऱ्या व गावातील राजकारणात १०० टक्के वर्चस्व असणाऱ्या नेत्यांच्या दहशतीमुळे गावकरी ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याचीही वास्तविकता आहे. ग्रामसभेत जे ठराव होतील त्यांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. परंतु लोकच जर ग्रामसभेला गेलेच नाही तर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा मनमानी कारभार सुरु होतो. कुठे ग्रामसभेच्या आठ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, तर कुठे खोट्या सह्या व अंगठे घेवून सरपंच, ग्रामसेवक ठरवतील असे खोटे ठराव घेवून पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे पाठवून नको तिथे भ्रष्टाचार केला जातो. पदाधिकारी लक्षाधीश बनत चालला आहे व गरीब मात्र गरीबच राहत आहे. त्याचा कुठला विकास होत नाही हे वास्तववादी सत्य असले तरी याला कारणीभूत ती जनताच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.