शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

कालबाह्य वाहनातून प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 6:00 AM

एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चित्र : पोलिसांसह परिवहन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने धावताना दिसतात.एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. प्रवासी मिळविण्याच्या नादात ही वाहने भरधाव पळविली जातात. यातील अनेक वाहने तर १० ते १५ वर्षे जुनी आहे.काही वाहने खिळखिळी झाली आहे; मात्र कशाचीही तमा न बाळगता चालक बिनधास्तपणे वाहन पळवित आहेत. अनेक वाहनांच्या आतील सर्व रचनाच बदलण्यात आली असून, अधिकाधिक प्रवासी नेता यावेत म्हणून प्रवाशांना धड बसताही येत नाही अशी आसने तयार करण्यात आली आहेत. नऊ आसन क्षमतेच्या वाहनात १५ ते २० प्रवासी कोंबले जातात, तर वाहनाच्या मागे आणि व्दारावर पाच ते सात प्रवासी दिसून येतात. चालकाच्या शेजारीही चार प्रवासी बसविले जातात. त्यामुळे चालकाला गेअर बदलविणेही अशक्य होते.या प्रकारामुळे एखादवेळी भीषण अपघात घडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार पोलीस आणि परिवहन विभागाला माहीत आहे; मात्र ते वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत नाही.अनेक वाहनांवर तर विनापरवाना चालक वाहन चालविताना दिसतात. एक-दोन महिने कंडक्टर असलेला तरुण एका रात्रीतून चालक होतो आणि मोठ्या ऐटीत वाहन चालवितो. अशा तरुणांची सध्या मोठी गर्दी झाली आहे. भरधाव वेगाने वाहन चालविताना रस्ता कसा आहे याचीही तमा बाळगली जात नाही.रस्त्यातील खड्डयातून वाहन सारखे उसळत असते. एकीकडे जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेकांना त्रास होत आहे. अशा स्थितीत कालबाह्य वाहनांतून प्रवास करताना जीव मुठीत ठेवावा लागतो.