शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सूचना- बातमी वाचता येत नाही. सावधान आता नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST

मात्र शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास पोलीसांकडून सदर व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ...

मात्र शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास पोलीसांकडून सदर व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे.

सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान जमावबंदी राहणार आहे. याअंतर्गत पाच पेक्षा अधिक लोकांच्या जमावास बंदी राहील. शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या काळात कोणत्याही व्यक्तीस वैध कारणाशिवाय किंवा सदर आदेशात नमूद अत्यावश्यक सेवेच्या कामाशिवाय सार्वजनिक रित्या बाहेर निघण्यास- फिरण्यास पुर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. या नियमांचे जिल्हावासीयांकडून काटेकोर पालन होणे अपेक्षित असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने 'ब्रेक दि चेन' धोरण जाहीर केले असून लोकांनी कोरोनाग्रस्त रुग्णांचे संपर्कात येऊ नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत गर्दी करू नये, कार्यक्रम आयोजित करू नये असे निर्देश आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत.

वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा यांना वरील आदेशातून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ, सर्व दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स हे पुर्णतः बंद राहतील. दळणवळण सोयी सुविधा या शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार असतील. रात्रौकालीन संचारबंदी, अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक बाबी, दुकाने, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक, कार्यालये, खाजगी वाहतूक, करमणूक, उपहारगृहे व बार, धार्मिक स्थळे, हेअर सलून, ब्युटी पार्लर, वृत्तपत्रे, शाळा महाविद्यालये, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, रस्त्यावरील खाद्य दुकाने, उत्पादनक्षम क्षेत्र, ऑक्सिजन उत्पादक, इकॉमर्स, को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बांधकाम याबाबत जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी ०५ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. उपरोक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ०८लोक ०५ के

बॉक्स

विना मास्क फिरणाऱ्यांवर होणार दंड

कोरोना या संसर्गजन्य आजारावर मास्क हे अत्यंत प्रभावी औषध असून संक्रमण राखण्यासाठी प्रत्येकाने योग्य रितीने मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलीस सुद्धा दंडात्मक कारवाई करणार आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे व पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी नागरिकांना केले आहे.