शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपद आरक्षणाची सोडत फेब्रुवारी महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST

तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. तुमसर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ३ ते ४ फेब्रुवारी ...

तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. तुमसर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ३ ते ४ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे. याकरिता निवडणूक विभागाची सरपंच आरक्षणा सोडतीकरिता धडपड सुरू आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरपंचपदाची आरक्षण सोडत १० ते १२ दिवसांत घेण्याचे निर्देश स्थानिक निवडणूक विभागाला दिले होते दिले होते. त्याअनुषंगाने सांगली निवडणूक विभागाची सरपंच आरक्षणकरिता नियोजन सुरू करण्यात आले आहे. येत्या ३ ते ४ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण होणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भ्रमंतीवर जाणार

सरपंच आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक ग्रामपंचायत सरपंच सदस्यांसह भ्रमंतीवर जाणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. सध्या सरपंचपदाकरिता मोर्चेबांधणी सुरू आहे. आता प्रतीक्षा आहे ती सरपंच आरक्षणाची बहुमताने पॅनल निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंच कोण होणार, कुणाची सोडत निघणार या चर्चेला उधाण आलेले आहे. अनेकजण सरपंचाची माळ आपल्या गळ्यात कशी पडेल या विचारात आहेत. अखेर सरपंच आरक्षणानंतरच सरपंच कोण होणार हे चित्र स्पष्ट होईल. अनेक पॅनलमध्ये राखीव उमेदवार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काहींचे पॅनल निवडून आले त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे; परंतु काही पॅनलमध्ये काही राखीव उमेदवार उपलब्ध नसल्याने विरोधी पक्षाकडे राखीव उमेदवार नसल्याने त्यांना सरपंचपद येथे मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न येथे भंगणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बॉक्स

अर्थकारणाला महत्त्व

सरपंचपद हस्तगत करण्याकरिता अनेकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी अखेरच्या क्षणाला अर्थकारणाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. येथे अपक्ष सदस्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये घोडेबाजाराला आतापासूनच सुरुवात झाल्याचे समजते. पंचायतराज लागू झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मोठा निधी थेट ग्रामपंचायतीकडे येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकारणाची दिशा गावातूनच पुढे सरकते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गावात आपलाच सरपंच व्हावा याकरिता राजकीय पक्षानेसुद्धा कंबर कसलेली दिसत आहे.