शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांचे मानधन चार महिन्यांपासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कित्येक योजनांचा वेळेत लाभार्थींना उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी कर्तव्यतत्पर नसल्याने प्रशासनाच भोंगळ कारभार पुढे येत आहे. ...

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कित्येक योजनांचा वेळेत लाभार्थींना उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी कर्तव्यतत्पर नसल्याने प्रशासनाच भोंगळ कारभार पुढे येत आहे. दरमहा मिळणारे हजार रुपये ज्येष्ठांना अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटच्या टोकाला सन्मानाने जगता यावे याकरिता शासनाने श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना अशा विविध योजना नावाखाली ज्येष्ठांचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दरमहा नियमित मानधन ज्येष्ठांना मिळत नसल्याने योजनेचे गांभीर्य शासन प्रशासनाला नसल्याचे दिसत आहे.

वर्षभरात एकदाही लाभार्थींना दरमहा नियोजित निधी मिळत नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयातून गरिबांना हजार रुपये मानधन दिला जातो; परंतु कधी केंद्राचे तर कधी राज्याचे मानधन थकीत राहते. त्यामुळे दरमहा नियोजित निधी मिळत नाही. तहसीलस्तरावर शासनस्तरावरून नियोजित निधी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थींना त्याचा फटका सहन करावा लागतो. कित्येक परिवारातील सदस्यांना ज्येष्ठांच्या मानधनाची सुद्धा अपेक्षा असते. घरातील वृद्धांच्या मानधनाची प्रतीक्षा घरच्या प्रमुखाला असते. अशा कठीण प्रसंगी शासनाने ज्येष्ठांचा मानसन्मान जपत दरमहा नियोजित मानधन त्यांना पुरवावा, अशी रास्त अपेक्षा ज्येष्ठांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलेली आहे.

सरकार बसून वर्ष लोटले; परंतु अजूनही लाखनी तालुक्यातील निराधार योजनेची बैठक झालेली नाही. त्यामुळे कित्येक गरजू निराधार योजनेपासून परावृत्त आहेत. योजना आहेत, पण कार्यान्वित नसल्याने योजनांचा उपयोग काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

गोरगरिबांच्या सेवेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. म्हातारपणात शक्यतो प्रत्येकाने आधार द्यावा. ज्येष्ठांची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. हे तत्त्वज्ञान सांगणारी आपली संस्कृती शासन मात्र जपताना दिसत नाही. शासनकर्त्यांना यांचे गांभीर्य लक्षात आले नाही हे विशेष!

चौकट

शेती नाही आणि वाळी नाही. म्हातारपणात राबणे जमत नाही. सरकारच्या, अन् देवाच्या भरवशावर जगतून जी. दर महिन्याला पैसे आले तर दवाईपाण्याला बरे होते जी. पण बँकेत गेलो होतो तर पैसे नाही म्हणते जी. अशी प्रतिक्रिया लाभार्थींकडून ऐकायला मिळते.