शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

करडीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांची पायपीट : पाणी पुरवठा योजनेची प्लास्टीक टँक उतरविली खाली

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथे पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करू पाहत आहे. आंबेडकर वॉर्डात पाण्याची टँक बसविण्यात आली. परंतु त्या योजनेतून नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. रिकामी पाण्याची टँक खाली काढण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतकडे रस्ते व नाली बांधकामासाठी पैसे आहेत. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी नाहीत काय? असा प्रश्न विचारला जात आहे.पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली. नवीन पाईप लावण्याचा प्रयत्नही झाला. परंतु तरीही आंबेडकर वॉर्डातील समस्या सुटलेली नाही.आंबेडकर वॉर्डात योजनेवर लावलेली पाण्याची प्लास्टीक टाकी रिकामी असून ती आता गांधी वॉर्डातील मागील भागात रिकामी पडलेली आहे. सध्या ती कुठेच वापरण्यात आलेली नाही. त्या टँकला जर भागवत डोहळे यांच्या घराजवळ मांडली तर तिकडील समस्या दूर होते. पण आंबेडकर वॉर्डातील समस्या मात्र जैसे थेच राहते.सध्या नागरिकांना गुंडभर पाणी मिळत नसल्याने आक्रोश वाढीस लागला आहे. ग्रामपंचायतीकडे रोड व नाल्यांसाठी पैसा आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नाही काय? असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालीत त्वरीत समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नळधारक मोहन किरणापुरे, वासुदेव काळे, जयदेव काळे, राजेश डोहळे, भास्कर साठवणे, भागवत डोहळे, शामराव डोहळे व इतर घरगुती नळधारकांनी केली आहे.आंबेडकर वॉर्डात सर्व ठिकाणी पाण्याची समस्या नाही तर फक्त काही घरापुरती आहे. पाणी समस्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न झालेत. नवे पाईप जोडून पाहिले, परंतु सुधारणा झालेली नाही. नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होत असून गाई-म्हशी धुतल्या जातात. समस्येवर उपाययोजनेसाठी विद्युत वितरण कंपनीला सकाळी एक तास वीज पुरवठा बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही.- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.

टॅग्स :water shortageपाणीकपात