शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
3
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
4
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
5
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
6
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
7
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
8
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
9
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
10
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
11
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
12
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
13
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
14
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
15
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
16
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
17
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
18
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
19
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

जेएमसी कंपनीच्यावतीने काम केले जात आहे. लाखनी लगतच्या मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुरमाडी नाल्यावर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे ३.४५ वाजता पुलाच्या काँक्रीट भरावाचे काम सुरु असताना एका बाजूचा स्लॅब कोसळला. त्यामुळे खळबळ उडाली. यावेळी तीन कामगार काम करीत होते. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही.

ठळक मुद्देलाखनीतील घटना : मोठा अनर्थ टळला, निर्माणाधीन पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी येथे निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपूलाचा स्लॅब गुरुवारी पहाटे कोसळला. पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र तीन कामगार किरकोळ जखमी झाले. स्लॅब कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई - कोलकात्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी येथे उड्डाणपूलाचे काम गत दीड वर्षांपासून सुरु आहे. जेएमसी कंपनीच्यावतीने काम केले जात आहे. लाखनी लगतच्या मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुरमाडी नाल्यावर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे ३.४५ वाजता पुलाच्या काँक्रीट भरावाचे काम सुरु असताना एका बाजूचा स्लॅब कोसळला. त्यामुळे खळबळ उडाली. यावेळी तीन कामगार काम करीत होते. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेथेच प्राथमिक उपचार करण्यात आले. .
लाखनी येथील केसलवाडा फाटा व पोलीस ठाण्याजवळ काम उड्डाणपुलाचे काम केले जात आहे. त्याअंतर्गत मुरमाडी नाल्याच्या दोन्ही बाजूला पूल तयार करण्याचे काम सुरु आहे.
मुरमाडी स्मशानभूमीच्या बाजूला पुलाचे काम सुरु असतांना अचानक स्लॅब पडल्याने कंपनीचे नुकसान झाले.
सदर बांधकाम कंपनीच्या कामावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सदर अपघाताच्यावेळी कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी मोठी घटना घडण्याची यापुढे शक्यता नाकारता येत नाही.

वाहतूक विस्कळीत
लाखनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूलाचे काम संथगतीने सुरु आहे. रस्त्याच्या मधोमध पिल्लर उभारले असून रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य ठेवले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून याठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. पंरतु अतिव्यस्त राष्ट्रीय महामार्गावरुन अहोरात्र वाहने धावत असतात. त्यामुळे शहरात वाहतूकीची कोंडी होते. तासन्तास वाहनाची लांब रांग लागलेली असते. याचा फटका बसत आहे. अपघाताची कायम भीती आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणखी येथे उपाययोजना करण्याची गरज आहे.