शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाअभावी शेतकऱ्यांची दैनावस्था

By admin | Updated: December 21, 2015 00:33 IST

स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचे स्वप्न आजही अपूर्ण असून सिंचनाअभावी वर्षानुवर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत जीवन जगत आले.

हरितक्रांतीचे स्वप्न कधी होणार पूर्ण ? : शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुचसंजय साठवणे साकोलीस्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचे स्वप्न आजही अपूर्ण असून सिंचनाअभावी वर्षानुवर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत जीवन जगत आले. ओल्या दुष्काळापापेक्षा आजवर कोरड्या दुष्काळाचेच शेतकऱ्यांची दैनावस्था केली आहे. शासनाचे दिशाहीन नियोजन राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, व्होटबमकची राजनीती, प्रकल्पनिर्मितीतील दिरंगाई, भ्रष्टाचार निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी लाचारीचे जीवन जगत आहे. शेतकरी आत्महत्या यातूनच जन्माला आले. हा एक भाग असून नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आले. कालच लवारी येथील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपाची व रब्बीची पेरणी खोळंबते. वेळेवर पाणी उपलब्ध नसल्याने पेरणी रोवणी व इतर मशागतीची कामे वेळेवर होत नाही. कामे खोळंबतात व इतर नियोजनही बिघडते. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. तुटपुंज्या पाण्यामुळे पिकांची उत्पादकता गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होतो. अल्प उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. हजारो हेक्टर शेतजमीन ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ओलीताची सोय नसल्याने बऱ्याचदा एका पाण्यासाठी शेतकऱ्याला हातचा पिकाला मुकावे लागते. पाऊस पडतो खरा, पण सक्षम यंत्रणेअभावी तो येतो तसा जातो. पाणी अडविण्याचे व साठविण्याचे साधन अपुरे आहेत.शासन शेतकऱ्यासाठी सिंचनाविषयी विविध योजना राबवितो. सिंचनासाठी विहिरी बंधारे, धरणे यावर कोट्यवधीचा खर्च होतो. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यापर्यंत पोहचताना दिसत नाही. पीक घेताना शेतकरी आपआपल्या पद्धतीने सर्वोतोपरी प्रयत्न करतो. पाणी, खते, बि बियाणे रोगराई किडींचा प्रादुर्भाव मनुष्यबळ पैसा या व इतर बाबी शेती करताना महत्वाच्या ठरतात. मात्र पाणी वगळता इतर बाबीची पूर्णता करताना शेतकरी तिळमात्रही मागे हटत नाही. रक्ताचे पाणी करून अहोरात्र मेहनत करून पोटच्या गोळ्याप्रमाणे पिकाची काळजी घेतो. मात्र शेवटी पावसासाठी हतबल होतो. त्यामुळे शेतकऱ्याला पूर्णत: निसर्गावरच अवलंबून राहावे लागते.शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवायचे असेल तर सिंचन सुविधा निर्माण करणे, वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मोठमोठे तलाव, मालगुजारी तलाव, खासगी तलाव, बोळ्यांचे खोलीकरण करणे, साठवण क्षमता वाढविणे, जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणणे अत्यंत महत्वाचे आहे.पूर्वीच्या काळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करणारे तलाव आज दहा एकराला सिंचनाची सोय करू शकत नाही ही परिस्थिती आहे.तालुक्यातील प्रकल्पांची अवस्था साकोली तालुक्यात मागील २० वर्षापासून निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र या २० वर्षात या प्रकल्पाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत पूर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतील हे शासनालाच ठाऊक. हा प्रकल्प पूर्ण झाल्यस तालुक्यातील २३ गावातील शेतीचा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो तर भीमलकसा प्रकल्पासारख्या कामाला अजूनही सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे साकोली तालुक्यात सध्यातरी सिंचनाची सोय नाही आहे. ती अवलंबून आहे जिल्हातील फक्त तलावाच्या भरवशावर व निसर्गावर.