शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्ज परतफेडीच्या विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

आमगाव (दिघोरी) : धान पिकासाठी उचललेले पीककर्ज ३१ मार्चपर्यंत परत करायचे असल्याने त्या कर्जाची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी दिसून ...

आमगाव (दिघोरी) : धान पिकासाठी उचललेले पीककर्ज ३१ मार्चपर्यंत परत करायचे असल्याने त्या कर्जाची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी दिसून येत असून, ते कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे.

परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी धान पिकासाठी पीक कर्ज म्हणून बँकेमधून व सोसायटीमधून कर्जाची उचल केली. ते कर्ज शासनामार्फत बिनव्याजी असून, ते ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड करायचे असते. यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात किडीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसला. अनेक शेतकऱ्यांना लागलेला खर्चसुद्धा निघालेला नाही. त्यामुळे हाती आलेल्या उत्पन्नामधून कर्जाची परतफेड कशाप्रकारे करावी, हा विचार शेतकऱ्यांसमोर उभा होता. अशातच मागीलवर्षी शासनाने नियमित कर्जफेड करीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत अनुदान देण्याचे घोषित केले होते. मात्र त्यांची अंमलबजावणी अजूनपर्यंत करण्यात आली नाही. यावर्षी त्याची अंमलबजावणी होईल, असे अनेकांना वाटत असतानाच शासनाने नियमित कर्जफेड करत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पीककर्ज ३१ मार्चपर्यंत परतफेड करावे, अशी घोषणा केली असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमनिरास झाला. कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे असलेले पीक कर्ज वेळेवर भरणे गरजेचे असल्याने त्या कर्जाची तरतूद कशी करावी, हा विचार शेतकऱ्यांसमोर असून, त्यांनी त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उधार, उसने करताना शेतकरी दिसत आहेत. तसेच आपल्याकडील असलेले दागिने गहाण ठेवून पैसा उभा करण्याची वेळ आली आहे. तसेच उत्पादन घटल्याने उपजीविका कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जे धान पीक हाती आले, ते शेतकऱ्यांनी आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर दिले. शासन आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर बोनसची घोषणा केली असली, तरी ती रक्कम मार्च महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती केली जात असल्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी पैसा उभा करण्याची वेळ आलेली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारासमोर उभा राहण्याची वेळ आली असून, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत जाहीर करण्यात आलेले अनुदान त्यांच्या पीक कर्जामध्ये जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.