शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेल्यावरही अधिकारी फिरकेना

By admin | Updated: December 21, 2015 00:32 IST

एखाद्या जीवाची किंमत काय असावी, असा प्रश्न कुणी विचारल्यास उत्तर कदाचित ‘अनमोल जिवाची काय किंमत’ असे मिळेल.

हरपली संवेदना : प्रकरण आकोट येथील शेतकरी आत्महत्येचेभंडारा : एखाद्या जीवाची किंमत काय असावी, असा प्रश्न कुणी विचारल्यास उत्तर कदाचित ‘अनमोल जिवाची काय किंमत’ असे मिळेल. मात्र प्रशासनाच्या उंबरठ्यावर एका शेतकऱ्याच्या जीवाची किंमत शून्य ठरली आहे. ‘बाबा कधीच परतणार नाही’? असा सवाल विचारणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्याची विचारपूस जिल्हा प्रशासनाच्या खात्यातील एकही कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचाऱ्याने न करावी ही मानवी जिवनाची शोकांतिका म्हणावी लागेल.हा प्रकार पवनी तालुक्यातील आकोट येथील मृत शेतकरी बाळकृष्ण नागो देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत घडला. तीन दिवस लोटूनही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्याने भेट दिलेली नाही. नापिकी व कर्जाला कंटाळून पवनी तालुक्यातील आकोट येथील बाळकृष्ण नागो देशमुख (४८) या शेतकऱ्याने गुरूवारी (१७ डिसेंबरला) शेतावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. देशमुख यांच्याकडे ३ एकर शेती असून या वर्षाला एकरी ५ पोते (४ क्विंटल) उत्पन्न झाले. देशमुख यांच्यावर सोसायटी, बँक, गावातील हात ऊसणवारी व सावकाराचे मिळून एकूण ३ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. कर्जापायी ते नेहमीच चिंंताग्रस्त राहत असल्याचे पत्नी मंदा देशमुख यांनी सांगितले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. जीव गेल्यावरही घटनेची माहिती घेण्याकरिता स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्याने देशमुख कुटुंबीयांकडे भेट दिली नाही. यापेक्षा मानवी संवेदना हरपल्याचे उदाहरण कोणते असेल. (प्रतिनिधी)माजी आमदार नरेंद्र भोंडेकरांनी दिली भेटपवनी तालुक्यातील आकोट येथील बाळकृष्ण देशमुख या कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आकोट येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दु:खात सहभागी झाले. विशेष म्हणजे घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी नरेंद्र भोंडेकर यांनी स्वत: या घटनेची माहिती पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांना भ्रमणध्वनीवरून दिली होती. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत हस्तक्षेप करून याबाबत माहिती देण्याचे सांगितल्याचे, भोंडेकर यांनी म्हटले. परंतु तीन दिवसांचा कालावधी लोटूनही तलाठ्यानेही देशमुख कुटुंबीयांकडे भेट दिली नाही. जीव गेल्यावरही शासनाचा महसूल खात्यातील साधा तलाठीही घटनास्थळी किंवा घरी भेट देत नसेल तर हा शासकीय नियमांचा भंग नाही काय? अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख विजय काटेखाये, उपसभापती ललित बोंद्रे, मुकेश थोटे, अनिल गायधने, माजी पंचायत समिती सदस्य महादेव देशमुख, उपसरपंच धनराज देशमुख, सुरेश धुर्वे, संजय रेहपाडे, मनोज वैरागडे, रामेश्वर बिलवणे, माजी सरपंच केवळराम देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ढोलसर येथे शेतकरी पुत्राची आत्महत्याविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील एका शेतकरीपुत्राने नापिकीला कंटाळून स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० डिसेंबरला सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संजय उदाराम शिवणकर (२४) असे मृतकाचे नाव असून तो कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्यासोबत आई, वडील व भाऊ राहत होते. त्याच्या वडीलांकडे २ एकर शेती आहे. रोगकिडींच्या आक्रमणामुळे त्यांना या शेतीतून केवळ १५ पोते धान झाले. त्यामुळे सोसायटीचे कर्ज इतर खासगी कर्ज कसे परतफेड करायचे या विवंचनेत तो नेहमीच राहायचा. अशातच आज सकाळी विमनस्क अवस्थेत त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मृतकाच्या कुटुंबाकडे सोसायटीचे ५० हजार रुपये, खासगी कर्ज ४० ते ५० हजार रुपये, नातेवाईकांकडील २० हजार आणि सोने तारण ठेवून ३० हजार रुपये कर्ज असल्याचे वडील उदाराम शिवणकर यांनी सांगितले.