शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात पोस्ट पेमेंट बँकेतून तीन कोटींचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळते घेत बदल स्विकारला. विविध योजनांमध्ये अमुलाग्रह बदल घडून आणले. त्यामुळे पोस्टाला आता पुन्हा सुवर्ण दिवस येऊ पाहत आहे.

ठळक मुद्देघरपोच सेवा : १४०० व्यक्तींनी घेतला लाभ, बँकातील गर्दी टाळण्यात यश

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटाच्या काळात बँकात होणारी गर्दी लक्षात घेता डाक विभागाने इंडियन पोस्ट पेमेंट बँक संकल्पना आणली. त्याचा लाभ लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला. मार्च महिन्यापासून आतापर्यंत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून तीन कोटी नऊ लाख रूपयांचे घरपोच वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील १४०६ व्यक्तींनी याचा लाभ घेतला.पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळते घेत बदल स्विकारला. विविध योजनांमध्ये अमुलाग्रह बदल घडून आणले. त्यामुळे पोस्टाला आता पुन्हा सुवर्ण दिवस येऊ पाहत आहे.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या एईपीएस (आधार अनेबल पेमेंट सिस्टिम) सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच रक्कम मिळते. या माध्यमातून ग्राहकाचे पोस्टात खाते नसतानाही बँक खात्यातून पैसे काढू शकतात. एईपीएस रोख पैसे काढणे, फंड ट्रान्सफर, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इंक्वायरी असे पाच प्रकारचे व्यवहार करता येतात. यासाठी योग्य ती खबरदारी घेत ग्राहकाचे आधारकार्ड लिंक असलेले बँक खाते, आधार नंबर, मोबाईल क्रमांक, फिंगर प्रमाणिकरण केले जाते. विनाशुल्क दहा हजार रक्कम काढता येते.जिल्ह्यात १३७ टपाल कार्यालय आहे. २०० हून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना पैसे मिळत आहे. परिणामी बँकातील गर्दीही कमी होत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात २३ मार्च ते ११ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात तीन कोटी नऊ लाख रूपये एईपीएस सिस्टीमच्या माध्यमातून आतापर्यंत वितरित केली आहे.कोरोना संकटाच्या काळात पोस्टाने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पोस्टमन कडून घरबसल्या पैसे मिळत असल्याने बँकात गर्दी कमी झाली. यामाध्यमातून अनेक जण घरबसल्या पैसे काढत आहेत. पोस्टाच्या विविध योजना आता अत्याधुनिक झाल्या असून त्याचाही लाभ मिळत आहे.-वैभव बुलकुंदे, शाखा प्रबंधक,भारतीय पोस्ट पेमेंट बँक, भंडारा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPost Officeपोस्ट ऑफिस