शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

चेवेला धरण विरोधात लोकप्रतिनिधींचा संघर्ष

By admin | Updated: July 3, 2014 23:24 IST

महाराष्ट्र व आंध्रप्रदेश (तेलंगाणा) या दोन राज्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या वर्धा नदीवर आंध्रप्रदेश सरकारकडून डॉ. बी.आर. आंबेडकर चेवेला धरणाच्या निर्मितीचे कार्य जोमात सुरू आहे.

गोंडपिंपरी : महाराष्ट्र व आंध्रप्रदेश (तेलंगाणा) या दोन राज्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या वर्धा नदीवर आंध्रप्रदेश सरकारकडून डॉ. बी.आर. आंबेडकर चेवेला धरणाच्या निर्मितीचे कार्य जोमात सुरू आहे. या धरणामुळे राज्य सिमेच्या पलिकडील तेलंगाणा राज्याचा बहुतांश भाग ओलिताखाली येणार असला तरी महाराष्ट्र राज्य सिमेवर वसलेल्या बहुतांश खेड्यांना या धरणापासून क्षती पोहचण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंंत्र्यांना करार रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले तर भाजपाकडून तेलंंगाणा अधिकाऱ्यांना सर्व्हे बंदी करण्यात आली आहे. दोन राज्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र अफाट आहे. याचे तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करुन पूर्वीच्या आंध्रप्रदेश सरकारने वर्धा नदीवर कोट्यवधी रुपये खर्चातून धरण बांधण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला. या प्रस्तावानुसार राज्य शासनाने बाधित होणाऱ्या गावांचा कुठलाही विचार न करता आंध्रप्रदेश सरकारशी करार केल्याचा आरोप नदीकाठावरील आसपासच्या गावकऱ्यांनी केला असून चेवेला धरणाविरोधात आजवर भाजपाच्या नेतृत्त्वात आंदोलने उभारली. त्यानंतर आंध्रप्रदेश राज्याचे विभाजन होताच क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन संभाव्य क्षती पोहचणाऱ्या गावांच्या बचावासाठी पुढाकार घेऊन आंध्रप्रदेश सरकारशी केलेला करार रद्द करून तेलंगाणा सरकारला धरण बांधकामासाठी परवानगी नाकारावी, अशी मागणी केली आहे. तर क्षेत्राच्या समस्यांसाठी आपण जनतेच्या मागणीनुसार चेवेला विरोधात संघर्ष करण्याची भूमिका देखील आ. धोटे यांनी स्पष्ट केली आहे.तत्पूर्वी चेवेला धरण निर्मिती कार्याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सिमेचे सर्व्हेक्षण करून येथील तहसीलदार कार्यालयाला भेट दिली. याच दरम्यान भाजपाचे माजी जि.प. उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संदीप करपे यांनी त्याचवेळी तहसील कार्यालय गाठून आंध्रप्रदेश (तेलंगाणा) राज्यातून दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. परराज्यातून महाराष्ट्रात दाखल घेऊन येथील क्षती पोहोचू शकणाऱ्या गावांच्या समस्या आपल्या शासनाकडे मांडून चेवेला धरणाबाबतचा महाराष्ट्र राज्य सीमेवरचे सर्वेक्षण बंद करण्याबाबतही अधिकाऱ्यांना बजावले. एका राज्याच्या फायद्यासाठी दुसऱ्या राज्यावर अन्याय करणे ही गंंभीर बाब असून क्षेत्रातील जनतेसाठी आपण रस्त्यावरही उतरु असा इशारा संदीप करपे यांनी दिला आहे.एकंदरीत क्षेत्रातील जनतेच्या हाकेवर धारुन सदर दोन्ही लोकप्रतिनिधींनी चेवेला विरोधात कंबर कसली आहे. (तालुका प्रतिनिधी)