शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर परिसरात धान कापणीचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

पालांदूर : निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत खरीप हंगाम हातातोंडाशी आलेला आहे. ९० ते १२० दिवसांच्या धानाचा कापणी हंगामाचा ...

पालांदूर : निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत खरीप हंगाम हातातोंडाशी आलेला आहे. ९० ते १२० दिवसांच्या धानाचा कापणी हंगामाचा श्रीगणेशा झालेला आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गोंडेगाव येथील अमित बोरकर यांच्या शेतातील धान कापणी सुरू झालेली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास चूलबंद खोऱ्यात धान कापणी धडाक्यात सुरू होऊ शकते.

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून धान घेतला जातो. जिल्ह्याला धानाचे कोठार संबोधले जाते. प्रत्येक शेतकरी धान उत्पादित करतो. मात्र, दिवसेंदिवस निसर्ग धोका देत असल्याने धानाचा हंगाम संकटात येत आहे. निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत शेती करणे जुगार खेळण्यासारखे झाले आहे. शासनाने पुरविलेल्या पीककर्जात हंगाम कसणे अशक्य झाले आहे. महागाईने कहर केला असून त्या तुलनेत धानाचे भाव अत्यल्प आहेत. १९४० रुपयांचा दर आधारभूत केंद्राअंतर्गत चालू हंगामासाठी जाहीर झालेला आहे. वास्तविक २५०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळणे अत्यावश्यक असतानासुद्धा लोकप्रतिनिधी मात्र भाव देण्यात कमी पडलेले आहेत. एका हंगामाचे उत्पन्न वर्षभर कुटुंबाचे पोषण करू शकत नाही. शासनाला याची जाणीव असूनही उपाययोजना करीत नसल्याने शेतकरी अठराविश्वे दारिद्र्यात खितपत जगत आहेत. परंतु नाईलाज असल्याने वडिलोपार्जित शेती आहे म्हणून कसत असल्याचा अनुभव तरुण पिढीतून पुढे येतो आहे.

हलक्या धानाचा शेतकरी पुरता हतबल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहत जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या पावसाच्या अंदाजाने हलक्या धानाचा शेतकरी पुरता हतबल आहे. मात्र, तुडतुडा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी धान कापणीकडे वळलेला आहे. १२० दिवसांच्या पुढील धानाला तुडतुड्याची लागण झालेली आहे. खर्चाची पर्वा न करता पीक वाचविण्यासाठी शेतकरी कीडनाशक फवारणी करीत आहेत. हलक्या ते मध्यम धानाला तुडतुड्यापासून दूर ठेवण्याकरिता कापणी बरी, असे म्हणत लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात धान कापणी सुरू झालेली आहे.

आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा

शासनाच्या नियमानुसार १ ऑक्टोबरपासून धान खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. मात्र, वेळकाढू धोरणात अडकलेले आधार केंद्र १ ऑक्टोबरपासून सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. लाखनी तालुक्यातील बऱ्याच कोठारात अजूनही गत रब्बी हंगामाचे धान पडून असल्याने खरिपाची खरेदी समस्येत येऊ शकते. ऑनलाईन खरेदी करण्याच्या अनुषंगाने धान खरेदी केंद्रावर नोंदणीकरिता शेतकऱ्यांच्या लांब रांगा अनुभवायला मिळत आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी तत्परता बाळगत वेळेत धान खरेदी केंद्र सुरू करणे शेतकरी हितार्थ ठरणार आहे.