शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीकृत दस्तऐवज बंद करणार

By admin | Updated: June 25, 2014 23:35 IST

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ग्राम पंचायत मधून संगणकीकृत दस्तऐवज देण्यात येत आहेत. यात नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.

चुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ग्राम पंचायत मधून संगणकीकृत दस्तऐवज देण्यात येत आहेत. यात नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. हे दस्तऐवज बंद करण्याचा निर्णय सिहोरा परिसरातील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतला असून गावकऱ्यांना न्याय मिळणार आहे.
राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने ग्राम पंचायतींना हायटेक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम पंचायतींना संगणक पुरवठा करण्यात आलेला आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे संगणक शो पीस झाली आहेत. अनेक ग्राम पंचायतीमध्ये विजेची सोय नाही. यामुळे संगणक धुळखात आहेत. याशिवाय आॅपरेटरच्या घरीच अनेक संगणक आहेत. दरम्यान विज कनेक्शन घेण्यास ग्राम पंचायती पुढाकार घेत नाहीत. ग्राम पंचायतींना बिगर घरगुतीच्या आधारावर वीज पुरवठा करणारे कनेक्शन विज वितरण कंपनी उपलब्ध करीत आहे. यामुळे अल्प उत्पन्न असणाऱ्या ग्राम पंचायती विज जोडणी पासून दोन हात दूर आहेत. दरम्यान ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना संगणकीकृत दस्तऐवज उपलब्ध केले जात आहेत. यात रहिवाशी दाखला, दारिद्रय रेषेखालील यादी क्रमांकाचा दाखला तथा अन्य दस्तऐवजाचा समावेश आहे. या प्रत्येकी दस्तऐवजाचे २५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. सरासरी ३ दस्तऐवजाचे ७५ रूपये गावकरी मोजत आहेत. यामुळे नागरिकांवर अतिरिक्त भुर्दंड बसत आहे. या दस्तऐवजांना गावकरी विरोध करीत आहेत. संगणक संचालित करणारे आॅपरेटर हे ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध राहत नाही. त्यांचा अधिक वेळ पंचायत समितीमध्ये आयोजित बैठकीत जात असल्याने, असे दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
या संगणकांना इंटरनेटने जोडण्यात आल्याचा मोठा उदोउदो करण्यात येत आहे. परंतु सिहोरा परिसरात तांत्रिक अडचणीमुळे संगणक आॅपरेटर सैरवैर झाली आहेत. ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक आॅपरेटर अन्य संगणक केंद्रमधून अडचण दुर करीत आहेत. याकरीता स्वत: अतिरिक्त पैसे मोजत आहेत. (वार्ताहर)