शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ‘बीटीबी’ महापुराच्या गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 5:00 AM

येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली.

ठळक मुद्देप्रशासनाकडून दुर्लक्ष :शेतकरी, व्यापारी, ग्राहकही संकटात, नुकसानीची पाहणी करण्यास कुणाला सवड नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना समृध्द करणारी येथील बीटीबी सब्जीमंडी वैनगंगेच्या महापुराने गाळात रुतली. एका रात्री होत्याचे नव्हते झाले. बीटीबीला बेटाचे रुप आले होते. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकही संकटात आले. मात्र पुर ओसरुन आता पंधरा दिवस झाले तरी शासन आणि प्रशासनाच्यावतीने साधी विचारपूसही करण्यात आली नाही.येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली. तेथील भाजीपाला, कॅरेटस् पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर तेथे असलेले वाहनही तीन दिवस ३० फुट पाण्यात होती. बीटीबी सब्जीमंडीच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. प्रत्येकजण याबाबत हळहळ व्यक्त करीत होते. आता पूर ओसरल्यानंतर बीटीबी सब्जीमंडी ओस पडल्याचे दृष्य आहे. शासनाकडून मदत मिळण्याची आशा आहे. परंतु ना अधिकाऱ्यांनी ना लोकप्रतिनिधींनी सब्जीमंडीला भेट दिली. साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.प्रशासनाने महापुराची वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान बीटीबीचे झाले नसते, एवढे बोलले जात आहे. बीटीबीने विविध सामाजिक उपक्रमात शासन आणि प्रशासनाला मदत केली. परंतु बीटीबी संकटात असताना कुणीही अद्यापपर्यंत मदतीला धावून आले नाही. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेने तीन दिवसाचा जनता कफर्यू लागू केला. यात जीवनावश्यक वस्तूंना सुट देण्यात आली. मात्र शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांचा विचार करण्यात आला नाही. बीटीबी थेट तीन दिवस बंद करण्याचा आदेश मिळाला त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आधीच महापुराने उद्ध्वस्त झालेली बीटीबी सावरण्याचा प्रयत्न करीत असताना प्रशासन मात्र कोणतीही सहकार्य करतांना दिसत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यातून समृध्दीची वाट दाखविणाºया बीटीबीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करीत आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान निश्चितच टाळता आले असते. पंरतु कोणतीच पूर्वसूचना मिळाली नाही. त्यामुळे बेसावध क्षणी बीटीबी सब्जीमंडी उद्ध्वस्त झाली. शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मदत करावी.- बंडू बारापात्रे,अध्यक्ष बीटीबी

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार