शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

भंडारा तापला, पारा ४४ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM

मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरींमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देउष्णतेमुळे नागरिक बेहाल : उष्ण लहरींचा प्रभाव वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी भंडाराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या आठवड्याभरात तापमानात वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे. उल्लेखनीय म्हणजे २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होत असल्याने उष्णतेतही वाढ होईल.मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरींमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे.सध्या लॉकडाऊनकाळात शासनाने बाजारपेठेसाठी शिथिलता प्रदान केल्यामुळे सायंकाळ ५ वाजेपर्यंतच दुकाने सुरू असतात. अशा उष्णतेतही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. अशांना उष्णतेचा फटका जाणवू लागला आहे. दोन दिवसानंतर नवतपा सुरू होणार असून मे हीटचा दणकाही नागरिकांना बसणार आहे. वाढत्या उष्णतामानामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करावा, असे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.२५ मे पासून नवतपा२५ मे पासून रोहणी नक्षत्राची सुरूवात होत असून या नक्षत्रामध्ये सतत ९ दिवस सूर्यदेव आग ओकत असल्याने त्याला नवतपा या नावाने संबोधले जाते. या नवतपामध्ये शरीरातील उष्णतामान वाढून उष्माघाताचे नवे संकट निर्माण होऊ शकते. या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. उष्माघात हा आजार कोणालाही होवू शकतो.मानवी शरीराचे समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, शारिरीक कमजोरी वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडपणा वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खूप तहान लागणे, उलट्या होणे इत्यादी उष्माघाताची ही लक्षणे असून वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.

टॅग्स :weatherहवामान