शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
3
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
4
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
5
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
6
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
7
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
8
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
9
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
10
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
11
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
12
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
13
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
14
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
15
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
16
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
17
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
18
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
19
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
20
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा तापला, पारा ४४ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरींमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देउष्णतेमुळे नागरिक बेहाल : उष्ण लहरींचा प्रभाव वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी भंडाराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या आठवड्याभरात तापमानात वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे. उल्लेखनीय म्हणजे २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होत असल्याने उष्णतेतही वाढ होईल.
मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरींमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे.
सध्या लॉकडाऊनकाळात शासनाने बाजारपेठेसाठी शिथिलता प्रदान केल्यामुळे सायंकाळ ५ वाजेपर्यंतच दुकाने सुरू असतात. अशा उष्णतेतही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. अशांना उष्णतेचा फटका जाणवू लागला आहे. दोन दिवसानंतर नवतपा सुरू होणार असून मे हीटचा दणकाही नागरिकांना बसणार आहे. वाढत्या उष्णतामानामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करावा, असे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

२५ मे पासून नवतपा
२५ मे पासून रोहणी नक्षत्राची सुरूवात होत असून या नक्षत्रामध्ये सतत ९ दिवस सूर्यदेव आग ओकत असल्याने त्याला नवतपा या नावाने संबोधले जाते. या नवतपामध्ये शरीरातील उष्णतामान वाढून उष्माघाताचे नवे संकट निर्माण होऊ शकते. या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. उष्माघात हा आजार कोणालाही होवू शकतो.
मानवी शरीराचे समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, शारिरीक कमजोरी वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडपणा वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खूप तहान लागणे, उलट्या होणे इत्यादी उष्माघाताची ही लक्षणे असून वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.

टॅग्स :weatherहवामान