शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भंडारा जिल्ह्यात कोरोनाने महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 9:41 PM

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ६५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. ५० वर्ष वयोगटावरील ३९ तर ५० वर्षाच्या आतील २६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असून त्यातही वृध्दांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्दे५० पुरुष कोरोनाचे बळीजिल्ह्यात मृतांचा आकडा ६५ वरपन्नास वर्षावरील ३९ तर ५० वर्षांच्या आत २६ व्यक्तींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोनाने बळीची संख्या वाढत असून त्यात सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत ६५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. ५० वर्ष वयोगटावरील ३९ तर ५० वर्षाच्या आतील २६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असून त्यातही वृध्दांची संख्या अधिक आहे.कोरोनाने भंडारा जिल्ह्यात पहिला बळी १२ जुलै रोजी घेतला. शहरातील एका ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात एकही मृत्यू नव्हता. त्यानंतर मृताची संख्या वाढायला लागली. ऑगस्ट महिन्यात मृत्यू संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यातही मृतांचा आकडा वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये ५० वर्षावरील सर्वाधिक पुरुष असल्याचे दिसून येते. तर आतापर्यंत १५ महिलांचा मृत्यू झाला असून त्यातही वृध्दांचाच अधिक समावेश आहे.

११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ५१ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी १५ जणांचा मृत्यू नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वेगाने वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.भंडारा तालुक्यात आतापर्यंत ४१ व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा शहरातील आहे. त्या खालोखाल तुमसर तालुक्यात १२, मोहाडी ७, साकोली आणि पवनी तालुक्यात प्रत्येकी दोन तर लाखनी तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. भंडारा शहरात मृत्यूची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्यातरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वाईट अनुभव येत आहे.बाधितांची संख्या तीन हजाराच्या उंबरठ्यावरजिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत दोन हजार ९६० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात १४९३ असून साकोली १९७, लाखांदूर ८९, तुमसर ३०१, मोहाडी ३१५, पवनी २४३, लाखनी तालुक्यातील ३०२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १४ हजार ७५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २९६० व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. सध्या ११९७ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.१६९८ व्यक्तींची कोरोनावर मातकोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे उपचाराखाली असणाऱ्या रुग्णापेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. २९६० कोरोनाबाधितांपैकी सोमवारी १३६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत १६९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ११९७ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. मात्र मृतांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस