शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST

पालांदूर : भंडारा जिल्ह्याला खनिज क्षेत्रात अव्वल ठरविणाऱ्या रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अवैध ...

पालांदूर : भंडारा जिल्ह्याला खनिज क्षेत्रात अव्वल ठरविणाऱ्या रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अवैध उत्खननाला संधी मिळात आहे. जिल्हाभर संधीचे सोने रेती तस्कर होत आहेत. आता जिल्ह्यातील ५१ रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे कळते. काही जिल्ह्यांतील लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण करत खनिज संपत्ती मुबलकता दिलेली आहे. या नैसर्गिक संपत्तीत रेती ही महत्त्वाची आहे. भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय-निमशासकीय बांधकामावर अवैधरितीने वाळूचा वापर सुरू आहे. शासन-प्रशासनाची अपेक्षित कारवाई दिसत नाही. जिल्ह्याबाहेर हजारो ब्रास रेतीचे वहन सुरूच आहे. भंडारा जिल्ह्यातील रेती घाटांचासुद्धा लिलाव व्हावा. या रेती घाटांतून मिळणाऱ्या उत्पन्नचा काही हिस्सा नदीकाठावरील गावांना देत त्या गावांचा चौफेर विकास साधण्याकरिता सहकार्य करावे, अशी उपेक्षा आहे.

पहिल्या टप्प्यात प्राथमिक माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील सूर, वैनगंगा, बावनथडी, चुलबंद नदीपात्रातील ५१ घाटांची लिलाव प्रक्रिया थेट तीन वर्षांकरिता निघाली. मात्र, नंतर पुन्हा तिला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे. लाखनी तालुक्यातील रेतीघाटपैकी केवळ तीनच रेतीघाटांना पहिल्या टप्प्यात स्थान मिळाल्याचे समजते. पळसगाव, मिरेगाव व भूगाव असे रेतीघाटचे नाव आहेत. पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील वाकल, तई, धर्मापुरी, पाथरी, नरव्हा, मऱ्हेगाव या रेतीघाटांचा पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेत समावेश नसल्याची माहिती आहे.

रेतीघाटांचा उपसा निर्देशित केलेल्या अभ्यासानुसार एक ते दीड मीटर खोली, लांबी-रूंदीचे नियोजन केलेले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना गावपातळीवर नियोजन करून त्यांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने रेती घाटाचे लिलाव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमाप रेती उपसा घडण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण घाट लिलावाची अमाप किंमत होय. त्यातील नियमांची जुळवाजुळव करत शाब्दिक खेळ करून अधिकाऱ्यांच्या मर्जीत येऊन लिलावधारक अमाप पैसे कमावतात. लांबी-रूंदी-खोली यांची मर्यादा उडवत रात्रंदिवस रेती उपसा करून खोऱ्याने पैसा कमवतात. कोट्यवधींच्या घरातील घाटांची किंमत निम्म्यावर आणणे व स्थानिक नागरिकांना न्याय देणे नितांत गरजेचे आहे.

चौकट

महाराष्ट्र शासनाच्यावतीने घरकुल योजनेत गोरगरिबांना सामावून घेण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. ‘ब’ यादीतील सर्वच लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे नियोजन केल्याचे पुढे आलेले आहे. या घरकुलाचा निधी जेमतेम आहे. अशा या गोरगरिबांच्या घरांना दोन ब्रास रेती मोफत देण्याचे शासनाचे धोरण ठरलेले आहे; परंतु गरिबांच्या घरांना सरसकट सगळ्यांनाच दोन ब्रास रेती मिळेनाशी झालेली आहे. लिलाव प्रक्रियेत घरकुल लाभार्थ्यांना दोन ब्रास रेती मोफत नियोजन करावे, अशी मागणी आहे.