शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
5
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
6
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
7
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
9
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
10
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
11
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
12
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
13
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
14
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
15
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
16
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
19
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
20
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी ‘भूमिअभिलेख’चा मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

सदर कार्यालयाला भेट दिली असता उपअधीक्षक उपस्थित नव्हते. त्यांच्याबद्दल काहीही सांगण्यास इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिला. उपअधीक्षकांकडे लाखांदूरचा कारभार असल्याची माहिती आहे. परंतु ते कार्यालयात केव्हा उपस्थित राहतात. याबाबत कोणताही कर्मचारी निश्चितपणे सांगू शकत नव्हता. मोबाईलवर संपर्क केला असता ते नॉटरिचेबल आढळून आले.

ठळक मुद्देनागरिकांची कामे रखडली : साहेब असतात कायम नॉट रिचेबल

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुका निर्मितीनंतर नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय कार्यालयांसोबतच भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयही सुरु करण्यात आले. परंतु गत दोन वर्षांपासून या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे.
सदर कार्यालयाला भेट दिली असता उपअधीक्षक उपस्थित नव्हते. त्यांच्याबद्दल काहीही सांगण्यास इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिला. उपअधीक्षकांकडे लाखांदूरचा कारभार असल्याची माहिती आहे. परंतु ते कार्यालयात केव्हा उपस्थित राहतात. याबाबत कोणताही कर्मचारी निश्चितपणे सांगू शकत नव्हता. मोबाईलवर संपर्क केला असता ते नॉटरिचेबल आढळून आले.
लाखनी नगर पंचायतीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या अर्जासोबत आखिव पत्रिका जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे फेरफार नोंदी, वारसा नोंदीकरिता शेकडो नागरिक भूमिअभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. त्याचप्रमाणे फेरफार नोंदी, वारसा नोंदी, खरेदीखत नोंदी, संबंधित कामे चार ते पाच महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे दिसून आले. आखिव पत्रीकासाठी दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागत असून अधिक शुल्क वसूल केले जात असल्याची तक्रार आहे. एखाद्याने यावर आक्षेप घेतला तर त्याचे काम प्रलंबित ठेवले जाते. कार्यालयातील उपअधीक्षक आठवड्यातून एखादा दिवशी उपस्थित राहत असल्याचे सांगण्यात आले. तेथील कर्मचारी मात्र साहेब मोजणीवर आहेत. कोर्टात आहेत. मिटींगमध्ये आहेत, असे उडवाउडवीची उत्तरे देतात. भूमिअभिलेख कार्यालयात येणाºया नागरिकांशी कर्मचारी उर्मटपणे वागतात, अशा आरोप नगरसेवक धनु व्यास यांनी केला. कामाचा निपटारा तात्काळ झाला नाही तर आंदोलनाचा इशारा त्यानी दिला.

भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचाºयांची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत. एका अधिकाºयाला चार दिवस भंडारा येथे कार्यालयात जावे लागते. यामुळे लोकांचा कामांना विलंब होतो.
- भी. मो. नान्ने
उपअधीक्षक, भूमिअभिलेख लाखनी

टॅग्स :Socialसामाजिक