शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे. जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची सूचना : ४८ तासांच्या आत माहिती देणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात माहिती संबंधित विमा कंपनीला सादर करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे.
जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.
शेतकºयांनी पीक नुकसान सूचना फॉर्म सोबत पीक विमा भरलेल्या पावतीची झेरॉक्स आणि शेतीचा सातबारा जोडणे आवश्यक आहे. सेतू सुविधा केंद्रावर सदर अर्ज उपलब्ध आहे. दोन दिवसाच्या आत विमा कंपनीचा प्रतिनिधी किंवा सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, कृषी सहाय्य, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी येथेही हा अर्ज सादर करता येणार आहे.
शेतकºयांच्या नुकसानीचे कृषी विभाग सर्वेक्षण करणार आहे. परंतु त्याआधी शेतकºयांनी स्वत: विमा कंपनीकडे सातबारा, नुकसानग्रस्त पिकाचे फोटो, आधारकार्ड, बँकेचा खातेक्रमांक यासह उपरोक्त दिलेल्या ई-मेलवर अथवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीलाल माहिती दिल्यास त्यांना पीक विमा मिळणे सोपे जाईल. यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सलग सुटीमुळे कृषी व महसूल विभागाचे सर्वेक्षण अद्यापही सुरु झाले नाही.
त्यामुळे ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनीपर्यंत पोहचविण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीच आता आपल्या शेतातील नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, कृषी विभागाच्या मदतीने सर्वेक्षण लवकरच सुरु होणारआहे.
-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Farmerशेतकरी