शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

घरातून निघताना अपघाताचे विचार मनात आले तर काय कराल? प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:14 IST

Premanand Maharaj Accident Speech: आजकाल अशी परिस्थिती आहे की रस्ते खड्डेमय आहेत, खड्डे चुकविताना दुसऱ्याच वाहनाच्या चाकाखाली जायची भीती आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा वातावरणात अपघाताचे विचार डोकावतात...

अनेकदा घरातून निघताना अपघात होण्याचे विचार मनात डोकावत असतात. आजकाल अशी परिस्थिती आहे की रस्ते खड्डेमय आहेत, खड्डे चुकविताना दुसऱ्याच वाहनाच्या चाकाखाली जायची भीती आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. कोणीही कसाही आडवा येतो आणि अपघात होतात. स्पीडब्रेकर तर अशा प्रकारे बनविले जातात की परदेशातल्या लोकांनी इथे येऊन इंजिनिअरिंगची पीएचडी करावी. अशा वातावरणातून गाडी चालवत ऑफिस किंवा कामाचे ठिकाण गाठत असताना आपल्याला काही होणार तर नाही ना, गाडीचा अपघात झाला तर असे विचार मनात हळूच डोकावतात आणि चिंता वाढवितात. अशा वेळी काय करावे असा प्रश्न वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार प्रेमानंद महाराज यांना विचारण्यात आला. 

वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार प्रेमानंद महाराज जी यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक दूरदूरून येतात. त्यांच्या सत्संगाचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत राहतात. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी घराबाहेर पडताना अपघाताची भीती वाटत असेल तर काय करावे हे सांगितले आहे.

यावर प्रेमानंद महाराजांनी देवाचे नामस्मरण करावे, येणारी सर्व संकटे दूर होतात असे सांगितले आहे. यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिले आहे, जे त्यांच्या भक्तांसोबत घडले आहे. अपघात होतानाही देव आपल्याला वाचवेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

आपले काही लोक गिरीराजची परिक्रमा करून रात्री उशिरा येत होते. आणि ड्रायव्हर झोपला. रात्रीचे दीड-दोन वाजले होते. गाडी डिव्हायडरवर चढली. आतल्या लोकांनी मोठ्याने राधे श्याम असे नामस्मरण केले. मागून बराच वेळ गाडी आली नाही. गाडी पलटलीही नाही. या काळात मागून गाडी आली असती, ठोकून गेली असती. ड्रायव्हर उतरला, माफी मागू लागला, असे महाराजांनी सांगितले. 

देवाचे नाव घ्या, आजपर्यंत कोणाला दगाफटका झाला नाही. देवावर विश्वास ठेवू पहा. पण त्या वेळी देवाची आठवण येत नाही. अभ्यास नसतो ना. तेव्हा संसाराची आठवण येते. अंतर्मनातून आवाज द्या, आम्ही तर आयुष्यभर तेच करत आलो आहोत, असा सल्ला महाराजांनी दिला आहे.  

टॅग्स :Accidentअपघात